शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

स्मारकांसाठी पैसा येतो कुठून?

By admin | Updated: November 20, 2015 04:16 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक बांधण्यासाठी व सेवाग्राम येथील आश्रमाच्या विकासाकरिता राज्य शासनाकडे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक बांधण्यासाठी व सेवाग्राम येथील आश्रमाच्या विकासाकरिता राज्य शासनाकडे कोट्यवधी रुपये आहेत, पण राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींकरिता शासन काही लाख रुपये देऊ शकत नाही, असे परखड भाष्य करीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाच्या अशा भूमिकेवर खंत व्यक्त केली. तसेच, स्मारकांसारख्या अनुत्पादक बाबींसाठी कोठून पैसा येतो, अशी मौखिक विचारणाही शासनास केली. न्यायालयाने आदेश देऊनही ४ वॉच टॉवर व इतर काही सुरक्षेसंदर्भातील बांधकामे निधीअभावी रखडल्यामुळे गडचिरोली जिल्हा कारागृह अद्याप कार्यान्वित होऊ शकलेले नाही. हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. यामुळे उद्विग्न झालेल्या न्या. भूषण गवई व न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने या प्रकरणात आदेश देताना शासनाला कडक शब्दांत फटकारले.राज्य शासनाने विविध उद्देशांकरिता कधी १०० कोटी तर, कधी १००० कोटी रुपये मंजूर केल्याचे वृत्तपत्रांमध्ये नेहमीच वाचायला मिळते. परंतु, यासोबतच राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, सामाजिक व आर्थिक विकास करणे व शांतता निर्माण करणे हेदेखील शासनाचे कर्तव्य आहे हे नव्याने सांगायला नको, असे न्यायालयाने नमूद केले. (प्रतिनिधी)नक्षली कैद्यांच्या प्रकरणावरून झापलेनागपूरसह अन्य विविध कारागृहांत बंदिस्त न्यायाधीन नक्षली कैद्यांना सुरक्षेच्या कारणावरून न्यायालयात हजर करण्यात येत नाही. याविरुद्ध मानवाधिकार संरक्षण समितीच्या सदस्य डॉ़ शोमा सेन यांनी याचिका केली आहे. या कैद्यांविरुद्ध गडचिरोली जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये खटले प्रलंबित आहेत. जिल्हा कारागृह कार्यान्वित केल्यास नक्षली कैद्यांना न्यायालयात उपस्थित करणे कठीण जाणार नाही, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.निधी मिळत नसल्यामुळे वॉच टॉवरसारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत. यामुळे न्यायालयाने वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून शासनाची कानउघाडणी केली. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. कैलास नरवाडे यांनी बाजू मांडली.प्रधान सचिवांना समन्सउच्च न्यायालयाने प्रकरणातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता प्रधान सचिव (कारागृह) यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ३ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केल्यामुळे कारवाई का करण्यात येऊ नये यावर लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे गडचिरोली जिल्हा कारागृहातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. पूर्वी कारागृहाची इमारत निरुपयोगी व विनासुरक्षा पडलेली होती. मुदत दोन महिन्यांनी वाढवूनही काम झाले नाही. उलट सरकारने निधीची कमतरता असल्याची सबब पुढे केली.अनुत्पादक बाबींसाठी शासनाकडे भरपूर पैसा आहे; पण, मूलभूत बाबींकरिता पैसे देण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. - न्यायालय