शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
7
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
8
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
9
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
10
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
11
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
12
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
13
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
14
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
15
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
16
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
17
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
18
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
19
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
20
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन

कुठे गेले अच्छे दिन ?

By admin | Updated: October 5, 2014 01:01 IST

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिवास्वप्न दाखविले, परंतु अवघ्या चार महिन्यातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कुठे गेले अच्छे दिन,असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज

पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल : काँग्रेसला एक हाती सत्ता द्यानागपूर : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिवास्वप्न दाखविले, परंतु अवघ्या चार महिन्यातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कुठे गेले अच्छे दिन,असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेत्यांना केला. शनिवारी पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त पारडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार गेव्ह आवारी, विलास मुत्तेमवार, बाबुराव वंजारी, तानाजी वनवे,युवक काँग्रेसचे बंटी शेळके नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. शंभर दिवसात विदेशी बँकातील काळा आणण्याची गर्जना भाजप नेत्यांनी केली होती. परंतु कुठे गेला हा पैसा. गुजरातच्या मार्गावर केंद्राची वाटचाल सुरू आहे. परंतु गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. म्हणूनच आम्ही दिलेले जाहीर चर्चेचे आवाहन स्वीकारण्याचे धाडस मोदी यांच्यात नाही. असे असले तरी मराठवाडा, विदर्भाचा विकास झाला तरच महाराष्ट्र पुढे जाईल. काँग्रेसला एक हाती सत्ता द्या, विकास काय असतो ते आम्ही दाखवू, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. नागपूर मेट्रोचे कामाला आम्ही सुरुवात केली. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नरेंद्र मोदींना आणून फित कापली. प्रकल्प आम्ही उभारले फित कापण्याचे काम भाजप नेते करीत आहेत. राज्यातील पालघर येथील प्रस्तावित सागरी सुरक्षा प्रबोधनी गुजरातला नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. परंतु महाराष्ट्रातील भाजप नेते गप्प होते. महाराष्ट्रात भाजपचा नेता क ोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच ते मोदींच्या सभांची वाट बघत आहेत. काँग्रेस सरकारने मेट्रोसाठी प्रयत्न केला, शेतकऱ्यासाठी १२-१३ हजार कोटींच्या योजना आणल्या. राजीव गांधी जीवनदायी योजना, मोफत औषध सुविधा, रोजगार निर्मिती, सांडपाणी व्यवस्थापन , झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र असे लोकोपयोगी उपक्र म राबवावयाचे आहेत. तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी , राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँगे्रसला एक हाती सत्ता द्या, असे आवाहन चव्हाण यांनी केले.सिंंचनावरील श्वेतपत्रिका व राज्य बँकेवर प्रशासन नेमल्याने मित्र पक्ष नाराज झाला. पारदर्शी व स्वच्छ कारभार देण्याचा प्रयत्न केला. परंतु यात आडकाठी आणण्याचे प्रयत्न झाल्याची टीका चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली.गेल्या पाच वर्षात पूर्व नागपुरातील विकास ठप्प झाला. त्यामुळे नागरिकांत निराशेचे वातावरण आहे. परंतु जनतेने सेवेची संधी दिल्यास पाच वर्षात मतदारसंघाचा कायापालट करू, अशी ग्वाही अभिजित वंजारी यांनी दिली.सभेला मोठी गर्दी होती.(प्रतिनिधी)दूध का दूध, पानी का पानीभाजपने २५ वर्षापूर्वीची युती तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही १५ वर्षापूर्वीची आघाडी तोडली. कुणालाही बहुमत मिळाले नाही तर निवडणुकीनंतर घोडेबाजार होईल. १९९५ सालात राज्यातील जनतेने युतीचा खंडणी वसुलीचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या, असे आव्हान चव्हाण यांनी विरोधकांना दिले.