शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

लातूरला आलेले पाणी जाते कुठे ?

By admin | Updated: May 7, 2016 02:20 IST

लातूरला रेल्वेद्वारे आतापर्यंत सुमारे पाच कोटी लीटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

- अतुल कुलकर्णी,  मुंबईलातूरला रेल्वेद्वारे आतापर्यंत सुमारे पाच कोटी लीटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही नागरिकांनी थेट मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. लातूर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हे पाणी जनतेला मिळत नसल्याचा प्राथमिक अहवाल मुख्य सचिवांकडे आल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यात पहिल्यांदा एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा केला गेला. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यासाठी विशेष निधी मंजूर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक वर्षे बंद पडलेले जलशुध्दीकरण केंद्र अवघ्या १५ दिवसांत सुरू केले. एवढे करूनही केवळ वाटपातील गोंधळामुळे नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर गृह विभागाने पाणी वाटपाबाबतचा अहवाल मागवला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुढील वर्षी लातूर महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे काही नगरसेवकांची लॉबी यात कार्यरत झाली असून, ज्यांनी मते दिली त्यांनाच पाणी द्या, असे राजकारण सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याबाबतही तक्रारी आहेत. रेल्वेने आलेले पाणी विहिरीत सोडल्यानंतर रात्री ते टँकर लॉबीला विकले जात असल्याचे निदर्शनास आले. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांची तातडीने बदली करण्याच्या सूचना दिल्या असून, येत्या आठवड्यात पालिकेला नवीन आयुक्त मिळण्याची शक्यता आहे. शिवाय जे नगरसेवक दुष्काळात देखील पाण्यावरून राजकारण करीत असतील तर त्यांची कृत्ये उघडकीस आणून त्यांना जनतेसमोर उघडे पाडा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत.खासगी टँकर पाणी पळवून करतात विक्री ?रेल्वेने रोज २५ लाख लीटर्स आणि माकणी धरणातून २५ लाख लीटर्स असे ५० लाख लीटर्स पाणी लातूरला मिळते. १०५ टँकर्सद्वारे ते नागरिकांना पुरविण्यात येते. मात्र खासगी टँकर्सद्वारे हे पाणी पळविले जात असून, त्याची विक्री होत असल्याचे समजते.