शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला आलेले पाणी जाते कुठे ?

By admin | Updated: May 7, 2016 02:20 IST

लातूरला रेल्वेद्वारे आतापर्यंत सुमारे पाच कोटी लीटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

- अतुल कुलकर्णी,  मुंबईलातूरला रेल्वेद्वारे आतापर्यंत सुमारे पाच कोटी लीटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही नागरिकांनी थेट मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. लातूर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हे पाणी जनतेला मिळत नसल्याचा प्राथमिक अहवाल मुख्य सचिवांकडे आल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यात पहिल्यांदा एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा केला गेला. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यासाठी विशेष निधी मंजूर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक वर्षे बंद पडलेले जलशुध्दीकरण केंद्र अवघ्या १५ दिवसांत सुरू केले. एवढे करूनही केवळ वाटपातील गोंधळामुळे नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर गृह विभागाने पाणी वाटपाबाबतचा अहवाल मागवला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुढील वर्षी लातूर महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे काही नगरसेवकांची लॉबी यात कार्यरत झाली असून, ज्यांनी मते दिली त्यांनाच पाणी द्या, असे राजकारण सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याबाबतही तक्रारी आहेत. रेल्वेने आलेले पाणी विहिरीत सोडल्यानंतर रात्री ते टँकर लॉबीला विकले जात असल्याचे निदर्शनास आले. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांची तातडीने बदली करण्याच्या सूचना दिल्या असून, येत्या आठवड्यात पालिकेला नवीन आयुक्त मिळण्याची शक्यता आहे. शिवाय जे नगरसेवक दुष्काळात देखील पाण्यावरून राजकारण करीत असतील तर त्यांची कृत्ये उघडकीस आणून त्यांना जनतेसमोर उघडे पाडा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत.खासगी टँकर पाणी पळवून करतात विक्री ?रेल्वेने रोज २५ लाख लीटर्स आणि माकणी धरणातून २५ लाख लीटर्स असे ५० लाख लीटर्स पाणी लातूरला मिळते. १०५ टँकर्सद्वारे ते नागरिकांना पुरविण्यात येते. मात्र खासगी टँकर्सद्वारे हे पाणी पळविले जात असून, त्याची विक्री होत असल्याचे समजते.