शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

युती तोडताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 6, 2014 09:11 IST

जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठे गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असेही ठाकरेंनी म्हटले आहे. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असून त्यांना श्रद्धांजली म्हणून शिवसेनेवर टीका करणार नाही अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तासगावमधील सभेत मांडली होती. मोदींच्या या विधानाचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. युती तुटल्यावर श्रद्धांजली दिल्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात  'बूंद से गयी...' हा विचार येऊ शकतो असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राला लुटले हे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रात आहे. गुजरातच्य मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईत येऊन मुंबईतील उद्योगपतींनी मुंबईत थांबू नये, गुजरातमध्ये चला असे आवाहन करतात. ही देखील महाराष्ट्राची लूट असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्र तोडण्यासाठी भाजप निवडणुकीत उतरले असून शेठ - सावकारांच्या सट्टाबाजारातील पैसा या निवडणुकीसाठी वापरला जात आहे असा आरोपही  ठाकरेंनी केला. 
 
शेळपटांना शिवरायांचे आशीर्वाद कसे मिळणार ? 
कर्नाटकमधील सीमाभागात मराठी जनतेवर अत्याचाराच्या टाचेखाली चिरडले जात असून शिवछत्रपतींचा आशीर्वादवाले महाराष्ट्रात येऊन त्यावर काहीच बोलत नाही असे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले आहे. केंद्रात भाजपची सरकार असून कानडी अत्याचाराविरोधात लोकसभेत राज्यातील भाजप खासदार गप्प बसून होते. अशा शेळपटांना शिवछत्रपतींचे आशीर्वाद कसा मिळणार असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.