शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

युती तोडताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 6, 2014 09:11 IST

जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठे गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असेही ठाकरेंनी म्हटले आहे. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असून त्यांना श्रद्धांजली म्हणून शिवसेनेवर टीका करणार नाही अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तासगावमधील सभेत मांडली होती. मोदींच्या या विधानाचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. युती तुटल्यावर श्रद्धांजली दिल्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात  'बूंद से गयी...' हा विचार येऊ शकतो असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राला लुटले हे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रात आहे. गुजरातच्य मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईत येऊन मुंबईतील उद्योगपतींनी मुंबईत थांबू नये, गुजरातमध्ये चला असे आवाहन करतात. ही देखील महाराष्ट्राची लूट असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्र तोडण्यासाठी भाजप निवडणुकीत उतरले असून शेठ - सावकारांच्या सट्टाबाजारातील पैसा या निवडणुकीसाठी वापरला जात आहे असा आरोपही  ठाकरेंनी केला. 
 
शेळपटांना शिवरायांचे आशीर्वाद कसे मिळणार ? 
कर्नाटकमधील सीमाभागात मराठी जनतेवर अत्याचाराच्या टाचेखाली चिरडले जात असून शिवछत्रपतींचा आशीर्वादवाले महाराष्ट्रात येऊन त्यावर काहीच बोलत नाही असे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले आहे. केंद्रात भाजपची सरकार असून कानडी अत्याचाराविरोधात लोकसभेत राज्यातील भाजप खासदार गप्प बसून होते. अशा शेळपटांना शिवछत्रपतींचे आशीर्वाद कसा मिळणार असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.