शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

देश कुठे चालला आहे ?

By admin | Updated: August 18, 2014 00:33 IST

खासगीकरणाच्या नावावर देशाला विकण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वच सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करण्यात आले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे फिक्सींग आहे. देशातील राजकीय पक्ष हे टाटा,

अर्थसंकल्पाची आंबेडकरी मीमांसा : ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा सवाल नागपूर : खासगीकरणाच्या नावावर देशाला विकण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वच सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करण्यात आले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे फिक्सींग आहे. देशातील राजकीय पक्ष हे टाटा, बिर्ला आणि अंबानीसारख्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असून देश नव्या ईस्ट इंडिया कंपनीचा गुलाम बनला आहे. सध्याची परिस्थिती बघता देश कुठे चालला आहे, असा सवाल मत शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी येथे व्यक्त केले. समता सैनिक दलातर्फे शनिवारी हिंदी मोरभवन येथे ‘भारत सरकारच्या अर्थसंकल्पाची आंबेडकरी मीमांसा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर होते तर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे आणि राष्ट्रीय प्रचारक प्रकाश दार्शनिक प्रमुख वक्ते होते. ब्रिगेडियर सावंत यांनी आपल्या भाषणात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगलेच धारेवर धरले. या देशातील समतावादी संस्कृती नष्ट करण्यासाठी विषमतावादी अर्थव्यवस्था रुजविण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुतोंडी आहे. खासगीकरणाच्या माध्यमातूनच या देशाचा विकास होऊ शकतो, अशी नवी समज देशात रुजविण्याचे कारस्थान सुरू आहे. संरक्षण व विमा क्षेत्रातील एफडीआय (प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक) ही ४९ टक्क्यावर नेऊन या देशातील डिफेन्सच्या जमिनी विक्रीला निघाल्या आहेत. इस्रायल व अमेरिकन कंपन्यांशी संगनमत करून हे सर्व केले जात आहे. काँग्रेस आणि भाजपा हे एकमेकांना कितीही शिवीगाळ करीत असले तरी ते याबाबत जुळी भावंडे आहेत. दोघांचाही उद्देश एकच आहे. उद्योगाला चालना देण्याच्या गोंडस नावाखाली सामान्य बहुजनांना संरक्षण देणारे कायदे रद्द केले जात आहेत. जोपर्यंत या देशातील शेतकऱ्यांच्या हातात पैसा येणार नाही तोपर्यंत देश विकास करू शकणार नाही. सामान्य माणूस सशक्त झाला नाही तर देश सक्षम कसा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रकाश दार्शनिक यांनीही अर्थसंकल्पातील सामान्यजनांवरील अन्यायावर प्रकाश टाकला. अशोक बोंदाडे यांनी प्रस्ताविक केले. डी.पी. रुपनारायण यांनी संचालन केले. सुनील सारिपुत्र यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. विमलकिर्ती, ई.मो. नारनवरे, घनश्याम फुसे, शंकर मानके, डी.बी. वानकर, केतन पिंपळापुरे, एकनाथ ताकसांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)