शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

मार्डचे प्रश्न सुटणार कधी?

By admin | Updated: June 30, 2015 03:15 IST

एमबीबीएस झाल्यावर स्पेशलायझेशनसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यानंतर एका वर्षाच्या बॉण्डवर डॉक्टरांना सही करावी लागते. ज्या शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे,

मुंबई : एमबीबीएस झाल्यावर स्पेशलायझेशनसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यानंतर एका वर्षाच्या बॉण्डवर डॉक्टरांना सही करावी लागते. ज्या शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, त्याच शाखेत डॉक्टरांना काम करण्याची संधी बॉण्डदरम्यान मिळाली पाहिजे, ही मार्डची प्रमुख मागणी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. स्पेशलायझेशनसाठी डॉक्टरांना तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण करावे लागते. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर १ वर्ष त्यांना बॉण्ड पूर्ण करणे बंधनकारक आहे. पण, या बॉण्डमध्ये डॉक्टरांना त्याच स्पेशलाईज्ड शाखेत काम करण्याची संधी मिळत नाही. फक्त ३० ते ४० टक्के डॉक्टरांनाच त्यांच्या स्पेशलाईज्ड शाखेत काम करण्याची संधी मिळते. उर्वरित ६० ते ७० टक्के डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करावे लागते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांचे वय साधारणत: २७ ते ३०च्या घरात असते. या वयात निकालानंतर लगेच बॉण्ड न मिळाल्याने घरी बसावे लागते. यामुळे निकालानंतर एका महिन्यात त्याच शाखेचा बॉण्ड द्यावा, असे मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. सुरक्षा, विद्यावेतनात वाढ या प्रश्नांसंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली आहे. पण, लिखित स्वरूपात काहीही मिळाले नाही. रुग्णसेवा करत असताना, निवासी डॉक्टरांना टीबीची लागण होते. टीबी झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती वाढणे आवश्यक असते. म्हणूनच टीबी झालेल्या निवासी डॉक्टरांना दोन महिन्यांची भरपगारी रजा द्यावी.महिला निवासी डॉक्टरांना प्रसूतीसाठीदेखील भरपगारी दोन महिने रजा द्यावी अशीही आमची मागणी आहे. पण, कोणत्याच मागणीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे २ जुलैपासून निवासी डॉक्टर सामूहिक रजा टाकण्याच्या पवित्र्यात असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.