शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

आजीवन पुनर्वसनाचा कायदा करणार तरी कधी?

By admin | Updated: January 5, 2016 01:50 IST

समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांचा सवाल.

बुलडाणा: आश्रमांमधील अनाथ मुलांच्या आजीवन पुनर्वसनाची जबाबदारी सरकार स्वीकारत नाही, तोपर्यंत या मुलांचे भविष्य सुरक्षित नाही. अंध, अपंग, मूक-बधिर मुला-मुलींना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही अनाथ आश्रमात ठेवले जात नाही. त्यांना बाहेर काढले जाते. जे विकलांग आहेत, असहाय्य आहेत, अनाथ आहेत, बेवारस आहेत, अशा मुलांना १८ वर्षांनंतर सुरक्षितता नसेल तर त्यांचे भविष्य अंध:कारमय आहे. एकटा शंकरबाबा यासाठी भांडतो, अजून किती दिवस भांडायचे, असा सवाल उपस्थित करीत कायदा करा, नाही तर हजारो मुले-मुली वाममार्गाला लागतील, असा इशारा समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी दिला. सोमवारी ह्यलोकमतह्ण कार्यालयास भेट देऊन त्यांनी संवाद साधला. यावेळी अपंगांच्या पुनर्वसन प्रश्नावर शंकरबाबा आक्रमक झाले होते.प्रश्न : असा कायदा नसल्यामुळे सामाजिक प्रश्न उभा राहू शकतो का ?-अर्थातच! अपंगांचा वाली कोण? समाजात अपंगांची संख्या खूप मोठी आहे. १८ वर्षे या अंध, अपंग, मूक-बधिर व मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या सर्व मुला-मुलींना सांभाळायचे, त्यांना वळण लावायचे अन् वयाची अट पूर्ण झाली की बाहेर काढायचे? त्यांचे रक्षण कोण करणार? दरवर्षी साधारणपणे एक लाख अपंगांना असे बेवारस जिणे जगावे लागते, हा सामाजिक प्रश्नच तर आहे. प्रश्न : या कायद्याबाबत तुमची लढाई आणखी किती दिवस ?-सरकारने ठरविले तर एका बैठकीत याबाबत वटहुकूम निघून कायदा होऊ शकतो. माझी लढाई सतत सुरु आहे. मी हा प्रश्न मरेपर्यंत सोडणार नाही, मिळेल त्या व्यासपीठावरून मी हा प्रश्न लावून धरत आहे. त्यामुळे आज ना उद्या नक्कीच यश येईल. शासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे का ?-हो, नक्कीच आहे. अनेक आमदार व खासदारांनी हा प्रश्न लावून धरला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचाही रेटा आहे. अपंगांच्या प्रश्नांचे गांभीर्य आता तरी सर्वांच्या लक्षात आले असेल. त्यामुळे या कायद्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा नक्कीच आहे.प्रश्न :ह्यवझ्झर पॅटर्नह्ण ला लोकांचा प्रतिसाद कसा आहे?-रस्त्यावर फेकून दिलेल्या मुला-मुलींना मी सांभाळले, त्यांना वळण लावले. आता या मुलींच्या लग्नात सारा समाज मदत करतो, आपली मुलगी म्हणून तिला मान देतो. तुमच्या राधेश्याम चांडक यांच्यासारखे शब्दाला जागणारे लोक पाठीशी उभे राहतात. हे सर्व लोकांच्या विश्‍वासामुळेच आहे. तुम्ही याला वझ्झर पॅटर्न म्हणा. मी माझे घर म्हणतो. प्रश्न : वझ्झर कसे आहे ?-वझ्झर हे अंध, अपंग, मूक-बधिर, अनाथ मुला-मुलींचे घर आहे. या घरामध्ये ९८ मुली व २५ मुले राहतात. या सर्वांना आधार कार्ड दिले आहे. या कार्डवर त्यांच्या नावामागे बाप म्हणून शंकरबाबा पापळकर हे नाव लिहिलेले आहे. हे केवळ कागदोपत्री नाव नाही, तर बाप म्हणून मी जबाबदारी स्वीकारतो. आतापर्यंत अपंग मुलींची लग्न लावली. त्यांचे संसार सुखाचे आहेत.