शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

.जेव्हा एक कप चहासाठी रेल्वे अधिकार्‍यांनी मोजले १0 रुपये

By admin | Updated: July 15, 2014 00:55 IST

रेल्वे स्थानकावर मनमानी कारभार : स्टॉल केले सील

अकोला : रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांंची विक्री करणारे काही व्यावसायिकांचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा प्रत्यक्ष अनुभव दस्तुरखुद्द भुसावळ रेल्वे मंडळाचे सहाय्यक प्रबंधकांनी शनिवारी घेतला. त्यांना चहाच्या ५ रुपयाच्या एका कपासाठी चक्क १0 रुपये मोजावे लागले. एवढेच नव्हे तर कपातील चहाचे प्रमाणदेखील कमी असल्याचे त्यांना आढळून आले. घडल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मंडळ अधिकार्‍यांनी ५ रुपयाचा चहाचा कप १0 रुपयाला विकणार्‍या फलाट क्रमांक दोनवरील सूर्या फूड अँग्रो लिमिटेड हे स्टॉल सील केले. अकोला रेल्वे स्थानकावर असलेल्या काही खाद्यपदार्थांंंच्या दुकानांवर मूळ किमतीपेक्षा जादा किमतीने खाद्यपदार्थांंंची विक्री होत असल्याच्या तक्रारी भुसावळ रेल्वे मंडळ प्रबंधकांकडे प्राप्त झाल्या होत्या. पदार्थांंंचा दर्जा आणि त्यांचे प्रमाण देखील कमी असल्याचा त्या तक्रारींमध्ये उल्लेख असल्याने संधीच्या शोधात असलेल्या सहाय्यक प्रबंधकांनी रेल्वे स्थानकाच्या तपासणीदरम्यान सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री ८.१५ ला अकोला रेल्वेस्थानकाच्या अप लाईनवर शंटिग करणार्‍या इंजीनची चाके रेल्वे रूळाखाली उतरली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक प्रबंधक प्रदीप बारापात्र आपल्या चमूला सोबत घेऊन विशेष गाडीने अकोल्यात दाखल झाले होते. इंजीन रुळावर आणण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पहाटे २.३0 च्या सुमारास भुसावळकडे परतण्यापूर्वी त्यांनी फलाट क्रमांक २ आणि ३ ची पाहणी केली. दरम्यान, अजय ठाकूर यांच्या सूर्या फूड अँग्रो लिमिटेड या स्टॉलवर ते पोहोचले. या ठिकाणी त्यांनी चहा व त्याची किमत विचारली. स्टॉलवर हजर असलेल्या कर्मचार्‍याने एका कपमध्ये अध्र्यापेक्षाही कमी चहा भरून त्यांच्याकडे १0 रुपयांची मागणी केली. अधिकार्‍यांची ओळख नसलेल्या त्या कर्मचार्‍याने चहाच्या दर्जाबाबत अधिकार्‍यांनी विचारणा केली असता भडकून त्याची कॉलर ओढेपर्यंंंत मजल मारली. मात्र, चहा मागणार्‍या व्यक्तीची खरी ओळख समजताच त्याने अधिकार्‍यांच्या पायाशी लोळण घेतले.शनिवारी सकाळी भुसावळ रेल्वे मंडळ प्रबंधकांच्या चमूने परत अकोला गाठले. स्थानिक अधिकर्‍यांना सोबत घेऊन त्यांनी अजय ठाकूर यांचे स्टॉल १५ दिवसांसाठी सील केले. मंडळ अधिकार्‍यांच्या या कारवाईमुळे रेल्वे स्थानकावर मनमानी कारभार करणार्‍यांमध्ये खळबळीचे वातावरण आहे.