शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

तुमच्या भांडणाशी मुंबईचा काय संबंध?

By admin | Updated: February 15, 2017 03:52 IST

मुंबई महापालिका निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. २५ वर्षे महापालिकेत यांनी एकत्र भ्रष्टाचार केला. आता कोंबड्यांसारखे झुंजत आहेत. यांच्या भांडणाशी मुंबईचा काय संबंध, असा सवाल राज यांनी केला. विक्रोळी येथील सभेने राज यांनी आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली. नव्या वर्षात नवा भारत दिसेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. मात्र, दोनशे जणांचा बळी घेणाऱ्या नोटाबंदीने काय साधले याचे उत्तर दिले जात नाही. खोट्या नोटा येतच आहेत. कॅशलेसचाही काही पत्ता नाही. निवडणुकीच्या मोसमात फक्त भाजपाकडे पैसा आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे आमच्याकडे पैसा, तुमच्याकडे नाही, असाच प्रकार सुरू आहे. सगळीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे होर्डिंग दिसत आहेत. कल्याण-डोंबिवलीसाठी सहा हजार कोटी देण्याची घोषणा त्यांनी पूर्वी केली होती. अजून साडेसहा रुपयेसुद्धा दिले नाहीत. शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी मुंबईतील मोकळ्या जागांवर स्वत:चे क्लब उघडले. सामान्यांसाठी काय केले, असा सवाल राज यांनी केला. २५ वर्षे पालिकेत सेना-भाजपा एकत्र आहेत. आता अचानक भाजपाला शिवसेनेचा भ्रष्टाचार दिसू लागला आहे. २५ वर्षे एकत्र होतात तेव्हा तुमच्या हाती काही लागले नाही का, इतकी वर्षे भ्रष्टाचाराला तुम्ही हातभार लावलाच ना, असा सवाल राज यांनी या वेळी केला. भाजपाला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. १९५२ साली स्थापन झालेल्या भाजपाला आजही दुसऱ्या पक्षातून उमेदवार फोडावे लागतात, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. शिवसेना-भाजपाच्या कारभारावर टीका करताना नाशिकमध्ये अवघ्या पाच वर्षांत विकासकामे केल्याचा दावा राज यांनी केला. पाच वर्षांत डम्पिंग ग्राउंडचा खत प्रकल्प केला. टाटांच्या सहकार्यातून बोटॅनिकल गार्डन उभारले. आजपर्यंत त्याला ५० हजार लोकांनी भेट दिली. स्वत: रतन टाटांनी त्या कामाचे कौतुक केले, असे राज म्हणाले. (प्रतिनिधी)परिस्थिती जैसे थे केवळ ३७ हजार कोटींचे बजेट मांडले जाते, काम केले जात नाही. नवीन रस्ते बांधल्यानंतर त्यावरील खड्डे बुजविण्याचे कंत्राट काढणारे मुंबई एकमेव शहर आहे. रस्ते, आरोग्य आणि शिक्षणावर कोट्यवधींचा खर्च होतो. मात्र परिस्थिती जैसे थे आहे, अशी टीका राज यांनी केली. पुढील चाळीस वर्षांसाठी नाशिकच्या पाण्याच्या प्रन सुटेल अशी पाइपलाइन योजना टाकली. खड्डे नसलेले रस्ते उभारले. टाटांच्या सहकार्यातून बोटॅनिकल गार्डन उभारले. आजपर्यंत त्याला ५० हजार लोकांनी भेट दिली. स्वत: रतन टाटांनी त्या कामाचे कौतुक केले, असे राज म्हणाले.