शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

१५ वर्षात झाले नाही ते दोन महिन्यात काय होणार ?

By admin | Updated: May 12, 2014 04:14 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना जलद निर्णय घेण्याच्या व तयारीला लागण्याच्या दिलेल्या सूचनांची भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी खिल्ली उडवली़

शिर्डी : लोकसभा निवडणुकीत झालेली दमछाक व येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना जलद निर्णय घेण्याच्या व तयारीला लागण्याच्या दिलेल्या सूचनांची भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी खिल्ली उडवली़ पवारांना हे उशिरा सुचलेले शहाणपण असून त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत अशा कानपिचक्या आपल्या मंत्र्यांना दिल्या असत्या तर राज्याचा विकास झाला असता. आता जे पंधरा वर्षात झाले नाही ते दोन महिन्यात काय होणार, असा उपरोधिक टोलाही मुंडे यांनी लगावला. पक्ष व पंतप्रधान देतील ती जबाबदारी स्वीकारू, आपल्याला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही, केवळ देशात व राज्यात काँग्रेस हद्दपार करणे एवढीच आपली इच्छा होती, असे सांगतानाच गरज पडल्यास महाराष्ट्रात परतण्याचे संकेतही मुंडे यांनी दिले़ भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी सपत्नीक साईदरबारी हजेरी लावली़ यावेळी रविकाका बोरावके, सचिन तांबे, प्रकाश चित्ते, गजानन शेर्वेकर, रवी गोंदकर, स्वाधीन गाडेकर, बद्री वाकचौरे, अशोक पवार आदींची उपस्थिती होती़ साईदर्शनानंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ राज्यात महायुतीला ३२-३५ जागा मिळतील व केंद्रात स्पष्ट बहुमत मिळेल,असा दावाही त्यांनी यावेळी केला़ विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन महायुतीत कोणताही वाद होणार नाही, असा दावा करत मुंडे यांनी मनसेच्या महायुतीतील प्रवेशाची शक्यता खोडून काढली़ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व भाजपाच्या संबंधाचा इन्कार करत राष्ट्रवादीला एनडीए मध्ये स्थान नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले़ सक्षम नेतृत्व व मुद्दे नसलेल्या काँगे्रसचे जहाज या निवडणुकीत भरकटले, त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवारही जाहीर करता आला नाही़ विकासाचे मुद्दे हरवलेल्या काँग्रेसने केवळ मोदींना टार्गेट केले़ पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल व प्रियंका यांनी निवांतपणे नेतृत्वाबाबत विचार करावा, नेहमी यशाचे श्रेय घेणार्‍या गांधी घराण्याने पराभवाचीही जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले़ यंदाच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन या नेत्यांची उणीव जाणवली़ मात्र दुसर्‍या फळीतील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ती दूर करण्याचा प्रयत्न केला़ काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख व आपण जवळचे मित्र होतो पण एकमेकांना राजकीय मदत करत नव्हतो, असे सांगून या निवडणुकीत आपल्याला त्यांची उणीव जाणवल्याचा मुंडे यांनी इन्कार केला़ काँग्रेसला मात्र त्यांची उणीव जाणवल्याचे मुंडे यांनी सांगितले़ (वार्ताहर)