शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

१५ वर्षात झाले नाही ते दोन महिन्यात काय होणार ?

By admin | Updated: May 12, 2014 04:14 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना जलद निर्णय घेण्याच्या व तयारीला लागण्याच्या दिलेल्या सूचनांची भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी खिल्ली उडवली़

शिर्डी : लोकसभा निवडणुकीत झालेली दमछाक व येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना जलद निर्णय घेण्याच्या व तयारीला लागण्याच्या दिलेल्या सूचनांची भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी खिल्ली उडवली़ पवारांना हे उशिरा सुचलेले शहाणपण असून त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत अशा कानपिचक्या आपल्या मंत्र्यांना दिल्या असत्या तर राज्याचा विकास झाला असता. आता जे पंधरा वर्षात झाले नाही ते दोन महिन्यात काय होणार, असा उपरोधिक टोलाही मुंडे यांनी लगावला. पक्ष व पंतप्रधान देतील ती जबाबदारी स्वीकारू, आपल्याला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही, केवळ देशात व राज्यात काँग्रेस हद्दपार करणे एवढीच आपली इच्छा होती, असे सांगतानाच गरज पडल्यास महाराष्ट्रात परतण्याचे संकेतही मुंडे यांनी दिले़ भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी सपत्नीक साईदरबारी हजेरी लावली़ यावेळी रविकाका बोरावके, सचिन तांबे, प्रकाश चित्ते, गजानन शेर्वेकर, रवी गोंदकर, स्वाधीन गाडेकर, बद्री वाकचौरे, अशोक पवार आदींची उपस्थिती होती़ साईदर्शनानंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ राज्यात महायुतीला ३२-३५ जागा मिळतील व केंद्रात स्पष्ट बहुमत मिळेल,असा दावाही त्यांनी यावेळी केला़ विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन महायुतीत कोणताही वाद होणार नाही, असा दावा करत मुंडे यांनी मनसेच्या महायुतीतील प्रवेशाची शक्यता खोडून काढली़ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व भाजपाच्या संबंधाचा इन्कार करत राष्ट्रवादीला एनडीए मध्ये स्थान नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले़ सक्षम नेतृत्व व मुद्दे नसलेल्या काँगे्रसचे जहाज या निवडणुकीत भरकटले, त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवारही जाहीर करता आला नाही़ विकासाचे मुद्दे हरवलेल्या काँग्रेसने केवळ मोदींना टार्गेट केले़ पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल व प्रियंका यांनी निवांतपणे नेतृत्वाबाबत विचार करावा, नेहमी यशाचे श्रेय घेणार्‍या गांधी घराण्याने पराभवाचीही जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले़ यंदाच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन या नेत्यांची उणीव जाणवली़ मात्र दुसर्‍या फळीतील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ती दूर करण्याचा प्रयत्न केला़ काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख व आपण जवळचे मित्र होतो पण एकमेकांना राजकीय मदत करत नव्हतो, असे सांगून या निवडणुकीत आपल्याला त्यांची उणीव जाणवल्याचा मुंडे यांनी इन्कार केला़ काँग्रेसला मात्र त्यांची उणीव जाणवल्याचे मुंडे यांनी सांगितले़ (वार्ताहर)