शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सर्जिकल स्ट्राइकची सत्यता काय पडताळता?

By admin | Updated: October 18, 2016 04:07 IST

आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही.

बदलापूर : आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही. जर ती असती तर भारताने यशस्वीपणे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या सत्यतेचे पुरावे एकाही राजकारण्याने मागितले नसते. राजकारण्यांच्या घरातील कुणी युद्धासाठी रणमैदानात जात नाही. त्यामुळे त्यांना शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कळत नाही आणि सर्जिकल स्ट्राइकवर अविश्वास दाखवला जातो. या स्ट्राइकचे पुरावे कसले मागता, असा परखड सवाल वीरमाता अनुराधा गोरे यांनी केला.भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बदलापुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शारदा वाचनालय आणि युवाराज प्रतिष्ठानतर्फे ‘लेखक-वाचक भेट’ या कार्यक्र माचे आयोजन केले होते. या अंतर्गत लेखिका आणि वीरमाता अनुराधा गोरे वाचकांच्या भेटीला आल्या होत्या. ‘देशाचे संरक्षण आणि आपली जबाबदारी’ या विषयावर त्या बोलत होत्या. देशातील विविध लढाया आणि त्यामागील राजकारणाबाबत गोरे यांनी संशोधनातून विपुल लेखन केले आहे. त्यावरूनच देशात झालेल्या लढाया, त्यातील यशापयशाची माहिती त्यांनी दिली. देशाच्या इतिहासात आजपर्यंत झालेल्या लढाया, त्यातील देश आणि आपला विजय यांची कारणे त्यांनी मांडली. देशात जेव्हाजेव्हा राजकारण्यांना हव्या तेव्हा लढाया झाल्या, त्यात्या वेळी भारताला मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे राजकारण्यांनी देशाच्या संरक्षणात एक तर ठाम भूमिका घ्याव्यात किंवा त्यांनी संरक्षण दलाला स्वायत्तता द्यावी, असे परखड मतही त्यांनी मांडले. >पाकिस्तान आता घरातचभारतातील राजकारण्यांनी आपला इतिहास लक्षात ठेवला नाही, म्हणून आज देशाचा भूगोल बदलला असून कराचीपर्यंत बेचिराख केलेला पाकिस्तान आता आपल्या घरात घुसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राजकीय निर्णयांमुळेच देशाचा नकाशा बदलला आहे, असे निरीक्षणही गोरे यांनी नोंदवले. भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त कॅप्टन आशिष दामले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.