शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

सर्जिकल स्ट्राइकची सत्यता काय पडताळता?

By admin | Updated: October 18, 2016 04:07 IST

आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही.

बदलापूर : आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही. जर ती असती तर भारताने यशस्वीपणे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या सत्यतेचे पुरावे एकाही राजकारण्याने मागितले नसते. राजकारण्यांच्या घरातील कुणी युद्धासाठी रणमैदानात जात नाही. त्यामुळे त्यांना शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कळत नाही आणि सर्जिकल स्ट्राइकवर अविश्वास दाखवला जातो. या स्ट्राइकचे पुरावे कसले मागता, असा परखड सवाल वीरमाता अनुराधा गोरे यांनी केला.भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बदलापुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शारदा वाचनालय आणि युवाराज प्रतिष्ठानतर्फे ‘लेखक-वाचक भेट’ या कार्यक्र माचे आयोजन केले होते. या अंतर्गत लेखिका आणि वीरमाता अनुराधा गोरे वाचकांच्या भेटीला आल्या होत्या. ‘देशाचे संरक्षण आणि आपली जबाबदारी’ या विषयावर त्या बोलत होत्या. देशातील विविध लढाया आणि त्यामागील राजकारणाबाबत गोरे यांनी संशोधनातून विपुल लेखन केले आहे. त्यावरूनच देशात झालेल्या लढाया, त्यातील यशापयशाची माहिती त्यांनी दिली. देशाच्या इतिहासात आजपर्यंत झालेल्या लढाया, त्यातील देश आणि आपला विजय यांची कारणे त्यांनी मांडली. देशात जेव्हाजेव्हा राजकारण्यांना हव्या तेव्हा लढाया झाल्या, त्यात्या वेळी भारताला मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे राजकारण्यांनी देशाच्या संरक्षणात एक तर ठाम भूमिका घ्याव्यात किंवा त्यांनी संरक्षण दलाला स्वायत्तता द्यावी, असे परखड मतही त्यांनी मांडले. >पाकिस्तान आता घरातचभारतातील राजकारण्यांनी आपला इतिहास लक्षात ठेवला नाही, म्हणून आज देशाचा भूगोल बदलला असून कराचीपर्यंत बेचिराख केलेला पाकिस्तान आता आपल्या घरात घुसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राजकीय निर्णयांमुळेच देशाचा नकाशा बदलला आहे, असे निरीक्षणही गोरे यांनी नोंदवले. भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त कॅप्टन आशिष दामले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.