शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

सर्जिकल स्ट्राइकची सत्यता काय पडताळता?

By admin | Updated: October 18, 2016 04:07 IST

आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही.

बदलापूर : आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही. जर ती असती तर भारताने यशस्वीपणे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या सत्यतेचे पुरावे एकाही राजकारण्याने मागितले नसते. राजकारण्यांच्या घरातील कुणी युद्धासाठी रणमैदानात जात नाही. त्यामुळे त्यांना शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कळत नाही आणि सर्जिकल स्ट्राइकवर अविश्वास दाखवला जातो. या स्ट्राइकचे पुरावे कसले मागता, असा परखड सवाल वीरमाता अनुराधा गोरे यांनी केला.भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बदलापुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शारदा वाचनालय आणि युवाराज प्रतिष्ठानतर्फे ‘लेखक-वाचक भेट’ या कार्यक्र माचे आयोजन केले होते. या अंतर्गत लेखिका आणि वीरमाता अनुराधा गोरे वाचकांच्या भेटीला आल्या होत्या. ‘देशाचे संरक्षण आणि आपली जबाबदारी’ या विषयावर त्या बोलत होत्या. देशातील विविध लढाया आणि त्यामागील राजकारणाबाबत गोरे यांनी संशोधनातून विपुल लेखन केले आहे. त्यावरूनच देशात झालेल्या लढाया, त्यातील यशापयशाची माहिती त्यांनी दिली. देशाच्या इतिहासात आजपर्यंत झालेल्या लढाया, त्यातील देश आणि आपला विजय यांची कारणे त्यांनी मांडली. देशात जेव्हाजेव्हा राजकारण्यांना हव्या तेव्हा लढाया झाल्या, त्यात्या वेळी भारताला मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे राजकारण्यांनी देशाच्या संरक्षणात एक तर ठाम भूमिका घ्याव्यात किंवा त्यांनी संरक्षण दलाला स्वायत्तता द्यावी, असे परखड मतही त्यांनी मांडले. >पाकिस्तान आता घरातचभारतातील राजकारण्यांनी आपला इतिहास लक्षात ठेवला नाही, म्हणून आज देशाचा भूगोल बदलला असून कराचीपर्यंत बेचिराख केलेला पाकिस्तान आता आपल्या घरात घुसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राजकीय निर्णयांमुळेच देशाचा नकाशा बदलला आहे, असे निरीक्षणही गोरे यांनी नोंदवले. भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त कॅप्टन आशिष दामले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.