शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राइकची सत्यता काय पडताळता?

By admin | Updated: October 18, 2016 04:07 IST

आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही.

बदलापूर : आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही. जर ती असती तर भारताने यशस्वीपणे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या सत्यतेचे पुरावे एकाही राजकारण्याने मागितले नसते. राजकारण्यांच्या घरातील कुणी युद्धासाठी रणमैदानात जात नाही. त्यामुळे त्यांना शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कळत नाही आणि सर्जिकल स्ट्राइकवर अविश्वास दाखवला जातो. या स्ट्राइकचे पुरावे कसले मागता, असा परखड सवाल वीरमाता अनुराधा गोरे यांनी केला.भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बदलापुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शारदा वाचनालय आणि युवाराज प्रतिष्ठानतर्फे ‘लेखक-वाचक भेट’ या कार्यक्र माचे आयोजन केले होते. या अंतर्गत लेखिका आणि वीरमाता अनुराधा गोरे वाचकांच्या भेटीला आल्या होत्या. ‘देशाचे संरक्षण आणि आपली जबाबदारी’ या विषयावर त्या बोलत होत्या. देशातील विविध लढाया आणि त्यामागील राजकारणाबाबत गोरे यांनी संशोधनातून विपुल लेखन केले आहे. त्यावरूनच देशात झालेल्या लढाया, त्यातील यशापयशाची माहिती त्यांनी दिली. देशाच्या इतिहासात आजपर्यंत झालेल्या लढाया, त्यातील देश आणि आपला विजय यांची कारणे त्यांनी मांडली. देशात जेव्हाजेव्हा राजकारण्यांना हव्या तेव्हा लढाया झाल्या, त्यात्या वेळी भारताला मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे राजकारण्यांनी देशाच्या संरक्षणात एक तर ठाम भूमिका घ्याव्यात किंवा त्यांनी संरक्षण दलाला स्वायत्तता द्यावी, असे परखड मतही त्यांनी मांडले. >पाकिस्तान आता घरातचभारतातील राजकारण्यांनी आपला इतिहास लक्षात ठेवला नाही, म्हणून आज देशाचा भूगोल बदलला असून कराचीपर्यंत बेचिराख केलेला पाकिस्तान आता आपल्या घरात घुसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राजकीय निर्णयांमुळेच देशाचा नकाशा बदलला आहे, असे निरीक्षणही गोरे यांनी नोंदवले. भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त कॅप्टन आशिष दामले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.