शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

अशा 'सुसंस्कृत' नेत्याविषयी मुख्यमंत्र्यांनी काय ते ठरवावे- शरद पवार

By admin | Updated: October 13, 2016 08:17 IST

भगवानगडाच्या पायथ्याशी झालेली भाषणे असंस्कृतपणाची आणि बेजबाबदारपणाची होती.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - भगवानगडाच्या पायथ्याशी झालेली भाषणे असंस्कृतपणाची आणि बेजबाबदारपणाची होती. त्या गडावर भाषणास परवानगी नाकारण्याचा निर्णय वर्तमान राज्यकर्त्यांचा होता. आणि त्याच्याशी बारामतीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुरान्वयानेही संबंध नाही. परंतु भाषणे करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली नाही. त्यामुळे अशा 'सुसंस्कृत' नेत्याविषयी काय भूमिका घ्यायची हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पवार म्हणतात, अशा असंस्कृतपणाच्या पातळीवर आपल्याला उतरता येणार नसल्याने संयम व सहनशीलता बाळगून शांतता राखावी. भगवानगडावर भाषणास परवानगी नाकारण्याचा निर्णय सर्वस्वी राज्यकर्त्यांचा होता. भाषणे करणारी मंडळी मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यामुळे ही सर्व त्यांची अंतर्गत बाब आहे. असे असतानाही एखाद्या मंत्र्याने एखाद्या भागाचे वाटोळे करीन असे म्हणणे बेजबाबदारपणाचेच नव्हे तर मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग करणारे आहे. कारण या शपथेत मंत्री म्हणून आपण द्वेष, क्रोध या भावना न बाळगता मंत्रिपदाचे काम करेन असा उल्लेख केलेला असतो.

हा प्रकार भगवान गडाचे महंत आणि ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील आहे. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणे शक्य आहे. आम्ही सत्तेत नसताना देखील गलिच्छ भाषेचा उपयोग केला जात आहे. फडणवीस सरकार या प्रकाराची आणि त्यांच्या सरकारमधील 'सुसंस्कृत' मंत्र्यांची दखल कशी घेणार याकडे आमचे लक्ष लागून राहिले आहे असेही पवार म्हणाले.