शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

'वाघा'च्या डरकाळीचंं काय झालं

By admin | Updated: July 6, 2016 14:18 IST

'धनुष्यबाण' हे शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलं तरी 'वाघ' शिवसेनेला त्याहून अधिक प्रिय आहे. जन्मापासून शिवसेनेने स्वत:ला वाघाशी जोडून घेतले.

ऑनलाइन लोकमत 

'धनुष्यबाण' हे शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलं तरी 'वाघ' शिवसेनेला त्याहून अधिक प्रिय आहे. जन्मापासून शिवसेनेने स्वत:ला वाघाशी जोडून घेतले. जंगलात वाघाचा एक दरारा, रुबाब असतो. सहसा वाघाच्या वाटयाला जाण्याची हिम्मत कोणी करत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही सन २००० पर्यंत शिवसेना तोच दरारा, रुबाब टिकवून होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दैनंदिन कामकाजात सक्रीय असताना शिवसेनेचं 'वाघपण' जाणवायचे, उठून दिसायचे. 
 
शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत १९९५ ते १९९९ हा साडेचारवर्षांचा काळ सोडता ४२ वर्ष शिवसेनेचे आमदार विधानसभेमध्ये विरोधी बाकावर बसले. राज्यात सत्ता काँग्रेसची असली तरी, शिवसेनेचा एक दरारा होता, वचक होता. जनमानसावर एक पकड होती. शिवसेनाप्रमुखांच्या मुखातून बंद हे शब्द निघाताच संपूर्ण मुंबईतील रस्ते ओस पडायचे. रस्त्यावर एक चिटपाखरुही दिसायचे नाही. 
 
शिवसेनाप्रमुख स्वत:हा सक्रीय असेपर्यंत शिवसेनेच्या डरकाळीने विरोधकांना धडकी भरायची. पण आज वाघाच्या डरकाळीतील ती दहशत, तो दरारा संपला आहे. डरकाळी फुटते ती फक्त  'सामना'च्या अग्रलेखात आणि भाषणात. प्रत्यक्षात या डरकाळीचा विरोधकांवर ना मित्रपक्षांवर कुठला परिणाम होतो. शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती गेल्यानंतर निश्चित शिवसेनेत काही चांगले बदल झाले आहेत. शहरीभागात मर्यादीत असणा-या शिवसेनेचा ग्रामीण भागात विस्तार झाला आहे. 
 
 
पण शिवसेनेचा म्हणून स्वत:चा एक वचक होता तो आता राहिलेला नाही. मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातून ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली. केंद्रात अठरा खासदार असणा-या शिवसेनेला मोदी-शहा जोडगळीने साधे विचारलेही नाही. वास्तविक राजकारणात भाजपचा सर्वाधिक जुना, विश्वासू मित्र कोण असेल, तर ती शिवसेना आहे. भाजपचे दिवगंत नेते प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नाने ही युती आकाराला आली. 
 
महाराष्ट्रात भाजप वाढली ती शिवसेनेच बोट धरुनच. महाराष्ट्रात भाजपला वाढायला शिवसेनेने मदत जरुर केली पण त्यावेळीही टोले, टोमणे लगावले. शिवसेनाप्रमुख नाराज झाले तर, लालकृष्ण अडवाणीसारखे बडे नेते मातोश्रीवर भेट घ्यायला यायचे. पण बाळासाहेबांनंतर शिवसेनेची आज ही परिस्थिती राहिलेली नाही. भाजपचा आज महाराष्ट्रात स्वत:चा जनाधार तयार झाला आहे. हे कटू वास्तव शिवसेनेने स्वीकारले पाहिजे. 
 
मोठया भावाची भूमिका बदलून आपली सध्या लहान भावाची भूमिका आहे हेच शिवसेना नेतृत्व स्वीकारायला तयार नाही. त्याच भावनेतून शिवसेना सामनामधून जळजळीत टीका करुन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दुखावते. मग केंद्रात आणि राज्यात संपूर्ण सत्ता हातात असलेली भाजपही शिवसेनेला दुय्यम स्थान दाखवण्याची संधी सोडत नाही. राजकारणात कोणीही कायम मोठया किंवा लहान भावाच्या भूमिकेत नसतो हे शिवसेनेने लक्षात घेतले तर, दोन्ही पक्षांची नळावरची भांडणे संपतील आणि शिवसेनेची राजकीय परिपक्वता अधोरेखित होईल.