शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

'वाघा'च्या डरकाळीचंं काय झालं

By admin | Updated: July 6, 2016 14:18 IST

'धनुष्यबाण' हे शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलं तरी 'वाघ' शिवसेनेला त्याहून अधिक प्रिय आहे. जन्मापासून शिवसेनेने स्वत:ला वाघाशी जोडून घेतले.

ऑनलाइन लोकमत 

'धनुष्यबाण' हे शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलं तरी 'वाघ' शिवसेनेला त्याहून अधिक प्रिय आहे. जन्मापासून शिवसेनेने स्वत:ला वाघाशी जोडून घेतले. जंगलात वाघाचा एक दरारा, रुबाब असतो. सहसा वाघाच्या वाटयाला जाण्याची हिम्मत कोणी करत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही सन २००० पर्यंत शिवसेना तोच दरारा, रुबाब टिकवून होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दैनंदिन कामकाजात सक्रीय असताना शिवसेनेचं 'वाघपण' जाणवायचे, उठून दिसायचे. 
 
शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत १९९५ ते १९९९ हा साडेचारवर्षांचा काळ सोडता ४२ वर्ष शिवसेनेचे आमदार विधानसभेमध्ये विरोधी बाकावर बसले. राज्यात सत्ता काँग्रेसची असली तरी, शिवसेनेचा एक दरारा होता, वचक होता. जनमानसावर एक पकड होती. शिवसेनाप्रमुखांच्या मुखातून बंद हे शब्द निघाताच संपूर्ण मुंबईतील रस्ते ओस पडायचे. रस्त्यावर एक चिटपाखरुही दिसायचे नाही. 
 
शिवसेनाप्रमुख स्वत:हा सक्रीय असेपर्यंत शिवसेनेच्या डरकाळीने विरोधकांना धडकी भरायची. पण आज वाघाच्या डरकाळीतील ती दहशत, तो दरारा संपला आहे. डरकाळी फुटते ती फक्त  'सामना'च्या अग्रलेखात आणि भाषणात. प्रत्यक्षात या डरकाळीचा विरोधकांवर ना मित्रपक्षांवर कुठला परिणाम होतो. शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती गेल्यानंतर निश्चित शिवसेनेत काही चांगले बदल झाले आहेत. शहरीभागात मर्यादीत असणा-या शिवसेनेचा ग्रामीण भागात विस्तार झाला आहे. 
 
 
पण शिवसेनेचा म्हणून स्वत:चा एक वचक होता तो आता राहिलेला नाही. मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातून ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली. केंद्रात अठरा खासदार असणा-या शिवसेनेला मोदी-शहा जोडगळीने साधे विचारलेही नाही. वास्तविक राजकारणात भाजपचा सर्वाधिक जुना, विश्वासू मित्र कोण असेल, तर ती शिवसेना आहे. भाजपचे दिवगंत नेते प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नाने ही युती आकाराला आली. 
 
महाराष्ट्रात भाजप वाढली ती शिवसेनेच बोट धरुनच. महाराष्ट्रात भाजपला वाढायला शिवसेनेने मदत जरुर केली पण त्यावेळीही टोले, टोमणे लगावले. शिवसेनाप्रमुख नाराज झाले तर, लालकृष्ण अडवाणीसारखे बडे नेते मातोश्रीवर भेट घ्यायला यायचे. पण बाळासाहेबांनंतर शिवसेनेची आज ही परिस्थिती राहिलेली नाही. भाजपचा आज महाराष्ट्रात स्वत:चा जनाधार तयार झाला आहे. हे कटू वास्तव शिवसेनेने स्वीकारले पाहिजे. 
 
मोठया भावाची भूमिका बदलून आपली सध्या लहान भावाची भूमिका आहे हेच शिवसेना नेतृत्व स्वीकारायला तयार नाही. त्याच भावनेतून शिवसेना सामनामधून जळजळीत टीका करुन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दुखावते. मग केंद्रात आणि राज्यात संपूर्ण सत्ता हातात असलेली भाजपही शिवसेनेला दुय्यम स्थान दाखवण्याची संधी सोडत नाही. राजकारणात कोणीही कायम मोठया किंवा लहान भावाच्या भूमिकेत नसतो हे शिवसेनेने लक्षात घेतले तर, दोन्ही पक्षांची नळावरची भांडणे संपतील आणि शिवसेनेची राजकीय परिपक्वता अधोरेखित होईल.