शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

वातावरणातील आर्द्रतेतून पिण्यायोग्य पाणी!

By admin | Updated: August 31, 2016 05:38 IST

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हैदराबाद येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला

राम देशपांडे , अकोलादुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हैदराबाद येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या अकोल्याच्या ‘रँचो’ने एक लहानसे उपकरण तयार केले आहे. जव्वाद पटेल असे या युवकाचे नाव असून, वातावरणातील आर्द्रतेतून तासाभरात दोन लीटर पिण्यायोग्य पाणी गोळा होईल असे एक अत्याधुनिक उपकरण त्याने तयार केले आहे.हैदराबाद येथील ‘इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ येथे अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या जव्वादने थर्मोडायनॅमिक टेक्नॉलॉजीवर आधारित ८00 ग्रॅम वजनाचे एक उपकरण तयार केले आहे. मोबाइलप्रमाणेच अर्धा तास बॅटरी रिचार्ज केल्यानंतर किमान आठ तास ते चालते. मुख्यत्वे चार प्रमुख भागांत विभागलेल्या या उपकरणाची रचना जव्वादने स्वत: थ्रिडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने केली आहे. संगणकीय तंत्रज्ञानावार आधारित या उपकरणाच्या वरच्या भागातील ६ व्होल्टचा पंखा वातावरणातील आर्द्रतेनुसारकमी-अधिक वेगाने फिरूनआतमध्ये येणारी हवा अधिकथंड करतो. त्याखाली स्मार्ट कंडेन्सर लागले असून, ते आतमध्ये येणाऱ्या हवेतील दवबिंदू विलग करते. त्याखाली तीन गाळण्या लागल्या असून, त्यातील पहिली गाळणी हवेतून विलग झालेल्या दवबिंदूंमधील विषारी धुलीकण विलग करते. त्याखाली ‘यूव्ही’ टेक्नॉलॉजी वापरण्यात आली असून, अल्ट्राव्हायलेट किरणे खाली आलेल्या दवबिंदूंमधील उर्वरित विषाणू घटक नष्ट करतात. तर तिसऱ्या गाळणीमध्ये संकलित होणाऱ्या पाण्याच्या थेंबांमध्ये लोह, कॅल्शियम आदी खनिज तत्त्वे मिसळली जातात. या सर्व प्रक्रियेतून खाली येणारे दवबिंदू खालच्या जारमध्येसंकलित होतात. तासाभरात दोन लिटर पाणी संकलित करण्यासाठी वातावरणात किमान ३0 टक्केसापेक्ष आर्द्रता असणे गरजेचे आह; त्यापेक्षा कमी आर्द्रता असेल तर जारमध्ये पाणी संकलित होण्यास अधिक वेळ लागू शकतो असे जव्वादचे म्हणणे आहे. जव्वादने तयार केलेल्या या उपकरणाची नोंद चेन्नईच्या स्वामित्व हक्क (पेटंट) कार्यालयानेघेतली असून, व्यावसायिक तत्त्वावर निर्मिती करण्यासाठी याला भारतासह अनेक देशांतून मागणी होत असली तरी, ‘मेक इन इंडिया’ या योजनेंतर्गत या उपकरणाची निर्मिती भारतातच करून, सर्वप्रथम त्याचा लाभ भारतीयांना करून देण्याचा मानस जव्वादने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.