शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

युतीचे कल्याण

By admin | Updated: November 7, 2015 04:07 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले शिवसेना आणि भाजपा आता एकत्र आले असून, शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.

अखेर जमले : महापौरपद अडीच वर्षांसाठी वाटून घेणार !मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले शिवसेना आणि भाजपा आता एकत्र आले असून, शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल भाजपाच्या विरोधात जात असताना मित्रपक्षाला दुखावण्याची जोखीम भाजपा घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच कल्याण-डोंबिवलीतील प्रचाराची कटुता विसरून शिवसेनेला सोबत घेण्याचे भाजपामध्ये ठरले. कल्याणमध्ये शिवसेनेला बाजूला सारून सत्तेचे गणित मांडले तर राज्याचा कारभार करताना शिवसेनेकडून असहकार्य आणि विरोधाची भूमिका घेतली जाईल व त्यातून कटुता वाढेल. त्यापेक्षा युती करून वाद मिटविण्याचा विचार भाजपाने केला, असे म्हटले जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात आज सायंकाळी बैठक झाली. त्याआधी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. युतीसाठी सर्वांनीच अनुकूलता दर्शविली. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची भूमिका युतीचीशिवसेनेला विचारात न घेता मनसे, अपक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादीत फोडाफोडी करून सत्ता मिळवावी, असा आग्रह भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांचा होता. मात्र प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता शिवसेनेला सोबत घेतले पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र महापौरपद आधी भाजपालाच हवे, याबाबत मुख्यमंत्री आणि दानवे आग्रही आहेत.