शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भारनियमनाचे सावट!

By admin | Updated: October 5, 2014 01:03 IST

सध्या राज्यात निर्माण झालेल्या कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वत्र भारनियमनाचे सावट पसरले आहे. यामुळे महावितरण कंपनीला रोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी होत

कोळसा-गॅसचा तुटवडा : उत्पादन घटले नागपूर : सध्या राज्यात निर्माण झालेल्या कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वत्र भारनियमनाचे सावट पसरले आहे. यामुळे महावितरण कंपनीला रोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार, महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पामधून किमान ५,५०० मेगावॅट विजेचे उत्पादन अपेक्षित असताना, तेथून केवळ चार ते साडेचार हजार मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. महानिर्मितीला वीजनिर्मितीसाठी रोज किमान ३२ रेक्स कोळशाची गरज असते. मात्र सध्या या कंपनीला केवळ १५ ते १६ रेक्स कोळसा मिळत आहे. त्याचा परिणाम वीज उत्पादनावर होऊन ते घटले आहे. खापरखेडा, चंद्रपूर, पारस व भुसावळ येथील प्रकल्पात फारच कमी कोळसा शिल्लक राहिला आहे. सोबतच इंडिया बुल्सकडूनही कोळशाअभावी २७० मेगावॅट वीज कमी मिळत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. याशिवाय गॅस पुरवठ्यासंबंधी विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. यात रत्नागिरी येथील १९५० मेगावॅटचा गॅस प्रकल्प बंद पडला आहे. तसेच उरण गॅस केंद्रातील १५० मेगावॅट वीजनिर्मिती कमी झाली आहे. खाजगी प्रकल्पापैकी अदानी प्रकल्पातून सुमारे अडीच हजार मेगावॅट वीज अपेक्षित असताना, ती गत काही दिवसांपासून केवळ १५०० ते १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. दुसरीकडे गत १५ दिवसांत विजेच्या मागणीत एक ते दीड हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. १५ दिवसांपूर्वी राज्यात सुमारे १४ हजार ५०० ते १५ हजार ५०० मेगावॅट विजेची मागणी होती. परंतु ती आता १६ हजार ५०० ते १६ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वाढली आहे. महावितरण ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रीय विद्युत एक्सचेंजकडून रोज सुमारे १००० ते १४०० मेगावॅट वीज खरेदी करीत आहे. याशिवाय निविदा प्रक्रियेतून ३०० मेगावॅट विजेची व्यवस्था केली जात आहे. (प्रतिनिधी)