शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

भारनियमनाचे सावट!

By admin | Updated: October 5, 2014 01:03 IST

सध्या राज्यात निर्माण झालेल्या कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वत्र भारनियमनाचे सावट पसरले आहे. यामुळे महावितरण कंपनीला रोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी होत

कोळसा-गॅसचा तुटवडा : उत्पादन घटले नागपूर : सध्या राज्यात निर्माण झालेल्या कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वत्र भारनियमनाचे सावट पसरले आहे. यामुळे महावितरण कंपनीला रोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार, महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पामधून किमान ५,५०० मेगावॅट विजेचे उत्पादन अपेक्षित असताना, तेथून केवळ चार ते साडेचार हजार मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. महानिर्मितीला वीजनिर्मितीसाठी रोज किमान ३२ रेक्स कोळशाची गरज असते. मात्र सध्या या कंपनीला केवळ १५ ते १६ रेक्स कोळसा मिळत आहे. त्याचा परिणाम वीज उत्पादनावर होऊन ते घटले आहे. खापरखेडा, चंद्रपूर, पारस व भुसावळ येथील प्रकल्पात फारच कमी कोळसा शिल्लक राहिला आहे. सोबतच इंडिया बुल्सकडूनही कोळशाअभावी २७० मेगावॅट वीज कमी मिळत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. याशिवाय गॅस पुरवठ्यासंबंधी विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. यात रत्नागिरी येथील १९५० मेगावॅटचा गॅस प्रकल्प बंद पडला आहे. तसेच उरण गॅस केंद्रातील १५० मेगावॅट वीजनिर्मिती कमी झाली आहे. खाजगी प्रकल्पापैकी अदानी प्रकल्पातून सुमारे अडीच हजार मेगावॅट वीज अपेक्षित असताना, ती गत काही दिवसांपासून केवळ १५०० ते १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. दुसरीकडे गत १५ दिवसांत विजेच्या मागणीत एक ते दीड हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. १५ दिवसांपूर्वी राज्यात सुमारे १४ हजार ५०० ते १५ हजार ५०० मेगावॅट विजेची मागणी होती. परंतु ती आता १६ हजार ५०० ते १६ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वाढली आहे. महावितरण ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रीय विद्युत एक्सचेंजकडून रोज सुमारे १००० ते १४०० मेगावॅट वीज खरेदी करीत आहे. याशिवाय निविदा प्रक्रियेतून ३०० मेगावॅट विजेची व्यवस्था केली जात आहे. (प्रतिनिधी)