शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आठवडे बाजार बंदला विरोध

By admin | Updated: July 1, 2016 02:11 IST

आठवडे बाजार हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो हिरावण्याचा कोणालाही अधिकार नाही.

लोणावळा : आठवडे बाजार हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो हिरावण्याचा कोणालाही अधिकार नाही. लोणावळा शहरातील आठवडे बाजार बंद करून कोणीही गोरगरिबांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा नागरिकांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आठवडे बाजार बंद करू इच्छिणाऱ्यांना दिला आहे. लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी व नगरसेवक यांनीदेखील आठवडे बाजार बंद होणार नाही. वेळ पडल्यास आठवडे बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा विचार करू, असे म्हटले आहे.मागील १२ वर्षांपेक्षा अधिक काळापासून लोणावळ्यात हुडको कॉलनीशेजारील नगर परिषदेच्या खेळाच्या मैदानावर शुक्रवारच्या दिवशी आठवडे बाजार भरतो. मावळातील सर्वांत मोठा आठवडे बाजार अशी या बाजाराची ओळख आहे. सुमारे पाचशे दुकाने या बाजारावर लावली जातात. यामध्ये भाजीपाला, किराणा माल, संसारोपयोगी वस्तू, कपडे, फळे, सुक्की मासळी अशा सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. लोणावळा शहरासह परिसरातील कुरवंडे, कुसगाव, ओळकाईवाडी, औंढे, औंढोली, डोंगरगाव, डोंगरगाववाडी, कुसगाववाडी, वरसोली, वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, पांगोळी, कुणेगाव, आपटी, गेव्हंडे, सदापूर, कार्ला, मळवली, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे आदी गावांचे लोक बाजारासाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते. नगर परिषदेला बाजारापासून २० ते २५ हजारांचे उत्पन्न दर आठवड्याला मिळते. उन्हाळा व थंडी असे आठ महिने हा बाजार हुडको कॉलनीजवळ भरतो. पावसाळ्यात सदर ठिकाणी चिखल होत असल्याने चार महिने सिद्धार्थनगर ते शाळा क्र. १ मार्ग, रायवूड परिसरात बाजार भरविला जातो. (वार्ताहर)>नागरिक, संघटनांच्या संतप्त प्रतिक्रियामागील दोन आठवड्यांपासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा बाजार सिद्धार्थनगर येथे सुरू झाला आहे. मात्र, या बाजारामुळे मार्गावर वाहतूककोंडी होत असल्याने घराकडे म्हणजे वर्धमान सोसायटीकडे जाण्यास त्रास होत असल्याची भूमिका घेत लोणावळ्यातील सर्व व्यापाऱ्यांनी नगर परिषदेला निवेदन दिले आहे. त्यात बाजारामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी केली आहे. नगर परिषदेच्या सभागृहात सर्व नगरसेवक व व्यापारी यांची या संदर्भात बैठक पार पडली. यामध्ये हा आठवडे बाजार बंद करण्याचा सूर काही मंडळींनी आळवला. अनेक मत-मतांतरे झाली. बाजार इतरत्र हलविण्याबाबतही साधकबाधक चर्चा झाली. मात्र, बाजार इतरत्र हलविल्यास त्या भागातील स्थानिक नागरिकदेखील त्या विरोधात आंदोलन करतील. सध्या भरत असलेला बाजार हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक बाजारहाटसह वस्तू खरेदीसाठीदेखील लोणावळ्यात येत असल्याने बाजार हा शहरातच असावा, अशी भूमिका काही नगरसेवकांनी मांडली. चर्चेअंती पावसाळ्यात चार महिने बाजार बंद ठेवण्यावर चर्चा सभागृहात करण्यात आली. ही चर्चा सभागृहाच्या बाहेर रंगल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत बाजार बंद करण्याचा प्रयत्न करू नका, तो शेतकऱ्यांचा मूलभूत हक्क आहे. हा बाजार बंद करून गोरगरिबांचे शाप घेऊ नका. जनता या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून लोणावळा बेमुदत बंद करेल, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांसह काही राजकीय पक्ष व संघटनांनी दिल्या आहे.