शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

आठवडे बाजार बंदला विरोध

By admin | Updated: July 1, 2016 02:11 IST

आठवडे बाजार हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो हिरावण्याचा कोणालाही अधिकार नाही.

लोणावळा : आठवडे बाजार हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो हिरावण्याचा कोणालाही अधिकार नाही. लोणावळा शहरातील आठवडे बाजार बंद करून कोणीही गोरगरिबांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा नागरिकांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आठवडे बाजार बंद करू इच्छिणाऱ्यांना दिला आहे. लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी व नगरसेवक यांनीदेखील आठवडे बाजार बंद होणार नाही. वेळ पडल्यास आठवडे बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा विचार करू, असे म्हटले आहे.मागील १२ वर्षांपेक्षा अधिक काळापासून लोणावळ्यात हुडको कॉलनीशेजारील नगर परिषदेच्या खेळाच्या मैदानावर शुक्रवारच्या दिवशी आठवडे बाजार भरतो. मावळातील सर्वांत मोठा आठवडे बाजार अशी या बाजाराची ओळख आहे. सुमारे पाचशे दुकाने या बाजारावर लावली जातात. यामध्ये भाजीपाला, किराणा माल, संसारोपयोगी वस्तू, कपडे, फळे, सुक्की मासळी अशा सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. लोणावळा शहरासह परिसरातील कुरवंडे, कुसगाव, ओळकाईवाडी, औंढे, औंढोली, डोंगरगाव, डोंगरगाववाडी, कुसगाववाडी, वरसोली, वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, पांगोळी, कुणेगाव, आपटी, गेव्हंडे, सदापूर, कार्ला, मळवली, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे आदी गावांचे लोक बाजारासाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते. नगर परिषदेला बाजारापासून २० ते २५ हजारांचे उत्पन्न दर आठवड्याला मिळते. उन्हाळा व थंडी असे आठ महिने हा बाजार हुडको कॉलनीजवळ भरतो. पावसाळ्यात सदर ठिकाणी चिखल होत असल्याने चार महिने सिद्धार्थनगर ते शाळा क्र. १ मार्ग, रायवूड परिसरात बाजार भरविला जातो. (वार्ताहर)>नागरिक, संघटनांच्या संतप्त प्रतिक्रियामागील दोन आठवड्यांपासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा बाजार सिद्धार्थनगर येथे सुरू झाला आहे. मात्र, या बाजारामुळे मार्गावर वाहतूककोंडी होत असल्याने घराकडे म्हणजे वर्धमान सोसायटीकडे जाण्यास त्रास होत असल्याची भूमिका घेत लोणावळ्यातील सर्व व्यापाऱ्यांनी नगर परिषदेला निवेदन दिले आहे. त्यात बाजारामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी केली आहे. नगर परिषदेच्या सभागृहात सर्व नगरसेवक व व्यापारी यांची या संदर्भात बैठक पार पडली. यामध्ये हा आठवडे बाजार बंद करण्याचा सूर काही मंडळींनी आळवला. अनेक मत-मतांतरे झाली. बाजार इतरत्र हलविण्याबाबतही साधकबाधक चर्चा झाली. मात्र, बाजार इतरत्र हलविल्यास त्या भागातील स्थानिक नागरिकदेखील त्या विरोधात आंदोलन करतील. सध्या भरत असलेला बाजार हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक बाजारहाटसह वस्तू खरेदीसाठीदेखील लोणावळ्यात येत असल्याने बाजार हा शहरातच असावा, अशी भूमिका काही नगरसेवकांनी मांडली. चर्चेअंती पावसाळ्यात चार महिने बाजार बंद ठेवण्यावर चर्चा सभागृहात करण्यात आली. ही चर्चा सभागृहाच्या बाहेर रंगल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत बाजार बंद करण्याचा प्रयत्न करू नका, तो शेतकऱ्यांचा मूलभूत हक्क आहे. हा बाजार बंद करून गोरगरिबांचे शाप घेऊ नका. जनता या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून लोणावळा बेमुदत बंद करेल, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांसह काही राजकीय पक्ष व संघटनांनी दिल्या आहे.