शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

५० ठिकाणी भरणार आठवडा बाजार!

By admin | Updated: September 5, 2016 04:35 IST

शेतात पिकणारा भाजीपाला थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये ५० आठवडा बाजार सुरू होणार

ठाणे : शेतात पिकणारा भाजीपाला थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये ५० आठवडा बाजार सुरू होणार असून शहरातील कोपरी परिसरात अशा स्वरूपाचा बाजार रविवारपासून सुरू झाला आहे. त्याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला.जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत भाजीपाल्याच्या आठवडा बाजारास प्रारंभ होणार असून त्याविषयीच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पणन तसेच जिल्हा पुरवठा विभागाला केल्या आहेत. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपरीतील आठवडा बाजाराचे उद्घाटन झाले, त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह ठाण्याचे महापौर संजय मोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांची भाजी मोठ्या प्रमाणावर आठवडा बाजारात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून एकनाथ शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात सर्वात जास्त आठवडा बाजार सुरू करून राज्यात एक आदर्श निर्माण करावा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. ठाणे जिल्हा प्रशासन आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने कोपरीच्या संत तुकाराम महाराज क्र ीडांगण येथे आजपासून आठवडा बाजार सुरू करण्यात आला. वाजवी दरात थेट शेतातली भाजी मिळत असल्याने पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामध्ये महिलांचा समावेश जास्त होता. या बाजारात डहाणू येथील बारी शेतकरी गट, सेव्हन स्टार, तिवारपाडा, मुरबाड येथून स्वयंसहायता गट, याशिवाय नगर, राहुरी, नाशिकहून शेतकरी भाजी आणि फळे घेऊन आल्याचे आढळले. सध्या गावदेवी मैदान (शनिवार), हिरानंदानी सोसायटी (रविवार), ब्रह्मांड सोसायटी (मंगळवार), साकेतला (रविवार) आणि रविवारी कोपरी, असे ठाणे शहरात ठिकठिकाणी पाच आठवडा बाजार सुरू झाले आहेत. ठाणे मनपाचे मैदान, वर्तकनगर, शिवाजी मैदान, तलावपाळी आणि ठाणे मनपा शाळा ४४, वर्तकनगर या ठिकाणीदेखील बाजार सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणीही लवकरच आठवडा बाजार सुरू करण्याचे नियोजन असल्याचे ठाणे उपजिल्हा निबंधक दिलीप उढाण आणि जिल्हा पणन व्यवस्थापक मोहन गंभीरराव यांनी सांगितले. या बाजारासाठी उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार किसान भदाणे, आत्माचे प्रकल्प संचालक पी.एम. चांदवडे, दीपक कुटे, ठाणे उपविभागीय कृषी अधिकारी अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.