शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन

By admin | Updated: February 18, 2017 04:27 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असेल़, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

नवी मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असेल़, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत शुक्रवारी सांगितले़ राज्यात सरकार पडावे यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न होत आहेत. त्यामुळे शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडणे हे जनतेच्या हिताचे नाही़ कोणत्याच आमदाराला मध्यावधी निवडणुका नकोत़ मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात चांगले संबंध आहेत़ त्यांच्यात निवडणुकीमुळे बिनसले आहे. विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीनंतरही ते मुंबईत सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील़ मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत असल्याने विजय निश्चित असून उपमहापौर आरपीआयचा असणार आहे़, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़राज्य सरकारमधून शिवसेनेने बाहेर न पडता, आरोप-प्रत्यारोपाऐवजी विकासावर भर द्यावा. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरए योजना राबवणे गरजेचे आहे़ मात्र पात्र-अपात्रतेची नियमावली ठरवण्याच्या वादामुळे त्यास विलंब होत आहे, असे आठवले यांनी सांगितले़नोटाबंदीचा निर्णय घाईत झाला असला, तरी तो योग्यच आहे़ त्यामुळे गैरमार्गाने काहींच्या खिशात जाणारा पैसा शासनाच्या तिजोरीत जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे ८० टक्के जनतेने स्वागत केले़ काँग्रेसकडून जाणीवपूर्वक राज्यसभेत गोंधळ घातला जात आहे़ त्यांनी पराभव मान्य करून सरकारला चांगल्या कामात साथ द्यावी़, असा सल्ला आठवले यांनी दिला़भाजपावर जातीयवादाचे आरोप करून ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळातच सर्वाधिक जातीवाद झाला़, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) नोटाबंदीचे जनतेने केले स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे ८० टक्के जनतेने स्वागत केले. काँग्रेसकडून जाणीवपूर्वक राज्यसभेत गोंधळ घातला जात आहे. सरकार आरक्षणाच्या बाजूने असून केवळ ‘सबका साथ हिंदूंचा विकास’ असे नाही तर ‘सबका साथ सबका विकास’ हे भाजपाचे धोरण आहे. जातीनिहाय आरक्षण रद्द करायचे असल्यास अगोदर जाती संपवण्याची गरज आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.