शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

राज्यातील पाणीपुरवठा योजनांची चौकशी करू

By admin | Updated: June 17, 2016 03:02 IST

राज्यातील पाणीपुरवठा योजनांची चौकशी करू

- यदु जोशी,  मुंबईराज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याची कबुली देतानाच या घोटाळ्यांची सखोल चौकशी केली जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी जाहीर केले. ‘लोकमत’ने गेले काही दिवस या घोटाळ्यांवर प्रकाश टाकला. याबाबत लोणीकर म्हणाले की, ग्राम पंचायतींच्या पातळीवर ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता समित्या, जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पातळीवर कुठे, काय भ्रष्टाचार झाला याची संपूर्ण चौकशी केली जाईल. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी समिती नेमली जाईल. ज्या यंत्रणेची चौकशी केली जात आहे त्यातील अधिकारी चौकशी समितीत न ठेवता अन्य शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश केला जाईल. गेल्या किमान १० वर्षांमधील सर्व पाणीपुरवठा योजनांची तपासणी केली जाईल, असे लोणीकर यांनी सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठा समित्या बरखास्त करण्याचीच सरकारची भूमिका आहे. पण चौकशीतून कोणी पळवाट काढू नये यासाठी आम्ही थांबलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्यात ३५० कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. तेथील १७०० गावांमधील एकेका कामाची आम्ही चौकशी केली. ती पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागला. राज्यातील घोटाळ्यांची चौकशी करताना ती लांबू नये याची दक्षता घेतली जाईल. जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग हा ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतो. असे असले तरी ग्रामीण पाणीपुरवठा योजना ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून आपण चौकशीचे स्वरूप निश्चित करू, असे लोणीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नगरपालिकांमध्येही कोट्यवधींचे घोटाळेकेवळ ग्रामीण भागातच नव्हे तर नगरपालिकांच्या शहरांमध्येही पाणीपुरवठा योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. स्थानिक नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतातून किमान ७५ नगरपालिकांमध्ये हा भ्रष्टाचार झाला. कोट्यवधी रुपये किमतीचे पाइप खरेदी करण्यात आले. पाण्याचे स्रोत न शोधता खरेदीवर भर देण्यात आला. कामे अर्धवट टाकून कंत्राटदार निघून गेले. निकृष्ट कामे झाली. नगरविकास विभागाचा कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी चौकशी करतील का, असा सवाल केला जात आहे.