शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: March 6, 2017 03:18 IST

रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बैलगाडी, तिचे दर्शन होणे आता अगदी दुर्मीळ झाले

गणेश चोडणेकर,आगरदांडा- शेत शिवारासह नागमोडी वाट असो किंवा सपाट-सखल मातीच्या कच्च्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बैलगाडी, तिचे दर्शन होणे आता अगदी दुर्मीळ झाले आहे. शेती व्यवसाय हद्दपार होऊ लागल्याने बैलगाडी देखील इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.प्राचीन काळात राजवटीत रथ होता. तेव्हापासून शेतकऱ्यांचे शेतीशी निगडित असे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या बैलगाडीला महत्त्वाचे स्थान होते. घरापुढे बैलगाडी असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. पूर्वी रस्त्यांचा विकास झालेला नव्हता. बैलगाडी हे त्यावेळी दळणवळणाचे प्रमुख साधन होते. त्यामुळे बैलगाडीला फार महत्त्वाचे स्थान होते. बैलगाडीतूनच नवरदेवाची वरात काढली जात असे, तसेच देवदेवतांची मिरवणूक काढली जात असे. लाकडाची सुबक, दणकट कलाकुसर करून बैलगाडी बनविण्याचे काम सुतार करीत असत. या बैलगाडीसाठी लागणारी चाके व तुब सागाच्या लाकडापासून बनविली जात, ही तुब काढण्यासाठी आतासारखे यंत्र नव्हते. ती हाताच्या कलाकुसरीने तयार केली जात असे. बैलगाडी बनविण्यासाठी १० ते १२ हजार रु पये खर्च होत होते. यामधून कारागिरास मजुरी मिळायची मात्र साधनसामग्रीचा विकास होत गेला. विजेवर चालणारे वेल्डिंग मशीन आल्यामुळे लाकडी बैलगाडीची जागा लोखंडी बैलगाडीने घेतली. त्यामुळे लोखंडी बैलगाडी बनविण्याचे कारखाने विकसित झाले.त्यामुळे आयती लोखंडी बैलगाडी मिळू लागल्याने लाकडी बैलगाडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. विज्ञानाचा जसा जसा विकास होत गेला डोंगर-दऱ्यातून पक्के रस्ते तयार झाले दळणवळणाच्या साधनांमध्ये वाढ झाली. शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, रिक्षा टेम्पो, व इतर मालवाहतूक साधने आली. याच्या मदतीने जलद वाहतूक होऊ लागली, शेतीचे कामेही जलद गतीने होऊ लागल्याने वेळेची बचत झाली. शेतमाल ट्रॅक्टरने व रिक्षा टेम्पोने बाजारात जाऊ लागल्याने बैलगाडीची गरज कमी झाली. मुरु ड तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या बैलगाड्या शिल्लक आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला पुस्तकात बैलगाडी बघायला मिळेल, असे वाटू लागले आहे.>तेलवडे येथील शेतकरी कृष्णाम्हात्रे म्हणाले की, आपल्या देशाचा विकास होत आहे. हे खरे असले तरी जुन्या गोष्टी विसरता कामा नये, शेतीचे काम संपल्यानंतर बैलगाडीतून पेंडा भरला जायचा, मात्र आता रिक्षा टेम्पो व इतर चारचाकी वाहनांमधून विक्र ीसाठी नेत असत तसेच मुरु ड तालुक्यात शेतकरी कमी राहिले आहेत. आताच्या तरु णांना शेती करायला आवडत नाही, शेती व्यवसाय कमी झाल्याने बैलगाडीचे महत्त्व कमी झाले आहे.