शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: March 6, 2017 03:18 IST

रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बैलगाडी, तिचे दर्शन होणे आता अगदी दुर्मीळ झाले

गणेश चोडणेकर,आगरदांडा- शेत शिवारासह नागमोडी वाट असो किंवा सपाट-सखल मातीच्या कच्च्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बैलगाडी, तिचे दर्शन होणे आता अगदी दुर्मीळ झाले आहे. शेती व्यवसाय हद्दपार होऊ लागल्याने बैलगाडी देखील इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.प्राचीन काळात राजवटीत रथ होता. तेव्हापासून शेतकऱ्यांचे शेतीशी निगडित असे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या बैलगाडीला महत्त्वाचे स्थान होते. घरापुढे बैलगाडी असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. पूर्वी रस्त्यांचा विकास झालेला नव्हता. बैलगाडी हे त्यावेळी दळणवळणाचे प्रमुख साधन होते. त्यामुळे बैलगाडीला फार महत्त्वाचे स्थान होते. बैलगाडीतूनच नवरदेवाची वरात काढली जात असे, तसेच देवदेवतांची मिरवणूक काढली जात असे. लाकडाची सुबक, दणकट कलाकुसर करून बैलगाडी बनविण्याचे काम सुतार करीत असत. या बैलगाडीसाठी लागणारी चाके व तुब सागाच्या लाकडापासून बनविली जात, ही तुब काढण्यासाठी आतासारखे यंत्र नव्हते. ती हाताच्या कलाकुसरीने तयार केली जात असे. बैलगाडी बनविण्यासाठी १० ते १२ हजार रु पये खर्च होत होते. यामधून कारागिरास मजुरी मिळायची मात्र साधनसामग्रीचा विकास होत गेला. विजेवर चालणारे वेल्डिंग मशीन आल्यामुळे लाकडी बैलगाडीची जागा लोखंडी बैलगाडीने घेतली. त्यामुळे लोखंडी बैलगाडी बनविण्याचे कारखाने विकसित झाले.त्यामुळे आयती लोखंडी बैलगाडी मिळू लागल्याने लाकडी बैलगाडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. विज्ञानाचा जसा जसा विकास होत गेला डोंगर-दऱ्यातून पक्के रस्ते तयार झाले दळणवळणाच्या साधनांमध्ये वाढ झाली. शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, रिक्षा टेम्पो, व इतर मालवाहतूक साधने आली. याच्या मदतीने जलद वाहतूक होऊ लागली, शेतीचे कामेही जलद गतीने होऊ लागल्याने वेळेची बचत झाली. शेतमाल ट्रॅक्टरने व रिक्षा टेम्पोने बाजारात जाऊ लागल्याने बैलगाडीची गरज कमी झाली. मुरु ड तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या बैलगाड्या शिल्लक आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला पुस्तकात बैलगाडी बघायला मिळेल, असे वाटू लागले आहे.>तेलवडे येथील शेतकरी कृष्णाम्हात्रे म्हणाले की, आपल्या देशाचा विकास होत आहे. हे खरे असले तरी जुन्या गोष्टी विसरता कामा नये, शेतीचे काम संपल्यानंतर बैलगाडीतून पेंडा भरला जायचा, मात्र आता रिक्षा टेम्पो व इतर चारचाकी वाहनांमधून विक्र ीसाठी नेत असत तसेच मुरु ड तालुक्यात शेतकरी कमी राहिले आहेत. आताच्या तरु णांना शेती करायला आवडत नाही, शेती व्यवसाय कमी झाल्याने बैलगाडीचे महत्त्व कमी झाले आहे.