शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

जलस्रोत शोध, नियोजनासाठी ‘वॉटस्कॅन’

By admin | Updated: May 27, 2016 01:45 IST

भूगर्भातील पाणीसाठ्याचा शोध आणि त्याच्या नियोजनासाठी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय)ने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या मशीनचा उपयोग केला जाणार आहे.

मुंबई : भूगर्भातील पाणीसाठ्याचा शोध आणि त्याच्या नियोजनासाठी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय)ने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या मशीनचा उपयोग केला जाणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये या मशीनचा वापर केला जाणार असून टंचाई निवारणासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवनात विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सीआयआयच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ व मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि लातूर या एकूण दहा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची निवड करुन या भागात जलस्त्रोतांचा शोध, पाण्याची साठवणूक आणि नियोजन करण्यासाठी सीआयआयने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशिनचा वापर सुरु करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जलसंपदा विभागातील अधिका-यांनी सीआयआयच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या मशीनच्या माध्यमातून जमीनीत कोणत्या ठिकाणी पाणी जमा होतो व कोणत्या ठिकाणी साठवणूक करावयाची आहे याची माहिती मिळते. (प्रतिनिधी)राष्ट्रीय ग्रामविकास संस्था उभारणार - मुख्यमंत्रीऔरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली असून संस्थेच्या उभारणीबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले. या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन विद्यापीठात ही संस्था स्थापन करण्यात येईल, असे ते म्हणाले. या संस्थेमार्फत ग्रामीण विकासाकरीता संशोधन, विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातील. कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार असून तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध अभ्यासक्रम चालविले जातील.