शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

४८६ गावांना ६५४ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: October 16, 2015 03:53 IST

पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू

संतोष वानखडे, वाशिम पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दफ्तरी आहे.गेल्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने, पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढत आहे. यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, पावसाळ्यातच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. सप्टेंबरच्या पंधरवाड्यात परतीचा पाऊस झाल्याने, मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची सरासरी बऱ्यापैकी भरून निघाली. या पावसाने टँकरची संख्या कमी केली. आॅगस्टपर्यंत १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली होती. आता ही संख्या ४८६ वर आली. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या १२ आॅक्टोबर २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात ४८६ गावांत ६५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये १३६ शासकीय व ५१८ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा ४९ होता. या वर्षी अल्प पाऊस झाल्याने अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे ३१९ गावांत ४४९ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण, अमरावती विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. नाशिक विभागातील १०४ गावांमध्ये १३० टँकर, पुणे विभागातील ६३ गावांमध्ये ७५ टँकर व औरंगाबाद विभागात ३१९ गावांत ४४९ टँकर असे एकूण ४८६ गावांमध्ये ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.