शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

४८६ गावांना ६५४ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: October 16, 2015 03:53 IST

पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू

संतोष वानखडे, वाशिम पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दफ्तरी आहे.गेल्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने, पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढत आहे. यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, पावसाळ्यातच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. सप्टेंबरच्या पंधरवाड्यात परतीचा पाऊस झाल्याने, मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची सरासरी बऱ्यापैकी भरून निघाली. या पावसाने टँकरची संख्या कमी केली. आॅगस्टपर्यंत १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली होती. आता ही संख्या ४८६ वर आली. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या १२ आॅक्टोबर २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात ४८६ गावांत ६५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये १३६ शासकीय व ५१८ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा ४९ होता. या वर्षी अल्प पाऊस झाल्याने अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे ३१९ गावांत ४४९ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण, अमरावती विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. नाशिक विभागातील १०४ गावांमध्ये १३० टँकर, पुणे विभागातील ६३ गावांमध्ये ७५ टँकर व औरंगाबाद विभागात ३१९ गावांत ४४९ टँकर असे एकूण ४८६ गावांमध्ये ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.