शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

४८६ गावांना ६५४ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: October 16, 2015 03:53 IST

पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू

संतोष वानखडे, वाशिम पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दफ्तरी आहे.गेल्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने, पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढत आहे. यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, पावसाळ्यातच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. सप्टेंबरच्या पंधरवाड्यात परतीचा पाऊस झाल्याने, मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची सरासरी बऱ्यापैकी भरून निघाली. या पावसाने टँकरची संख्या कमी केली. आॅगस्टपर्यंत १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली होती. आता ही संख्या ४८६ वर आली. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या १२ आॅक्टोबर २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात ४८६ गावांत ६५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये १३६ शासकीय व ५१८ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा ४९ होता. या वर्षी अल्प पाऊस झाल्याने अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे ३१९ गावांत ४४९ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण, अमरावती विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. नाशिक विभागातील १०४ गावांमध्ये १३० टँकर, पुणे विभागातील ६३ गावांमध्ये ७५ टँकर व औरंगाबाद विभागात ३१९ गावांत ४४९ टँकर असे एकूण ४८६ गावांमध्ये ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.