शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

सोलापूरला पाणीटंचाई : आषाढी यात्रेसाठी उजनीतून पाणी सोडणार

By admin | Updated: July 5, 2016 20:51 IST

पंढरपूरला आषाढी यात्रेनिमित्त होणारी वारकऱ्यांची गर्दी व सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

आषाढी यात्रेसाठी उजनीतून पाणी सोडणारसोलापूरला पाणीटंचाई: महापालिका दीड कोटी पाणीपट्टी भरणारसोलापूर : पंढरपूरला आषाढी यात्रेनिमित्त होणारी वारकऱ्यांची गर्दी व सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. मंत्रालयात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरच्या संभाव्य पाणी टंचाईबाबत बैठक घेतली. बैठकीला महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम उपस्थित होते. याचवेळी सोलापुरात जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी उजनीतून भीमेत पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अभियंता चौगुले, मनपा पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता राजकुमार रेड्डी उपस्थित होते. औज बंधाऱ्यात १२ दिवस पुरेल इतपत पाणीसाठा आहे. या काळात पाऊस न पडल्यास सोलापूरच्या पाणी पुरवठयाची स्थिती बिकट होणार आहे. संभाव्य पाणीटंचाई ओळखून उजनीतून भीमेत पाणी सोडणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेला दीड कोटी भरावे लागतील असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने दिला. याबाबत पालकमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली. १५ जुलैनंतर होणारी पाणीटंचाई ओळखून महापालिका दोन दिवसात दीड कोटी भरेल असे आयुक्त काळम यांनी सांगितले. आषाढी यात्रेसाठी पाटबंधारे खात्यातर्फे भीमेत पाणी सोडण्यात येणार आहे. याबरोबरच सोलापूरसाठी जादा पाणी सोडण्यात येईल. यातून औज व चिंचपूर बंधारा साडेचार मीटर क्षमतेने भरून दिला जाईल. यातून सोलापूरची पुढील दोन महिन्याची पाण्याची चिंता मिटेल. उजनी धरणात सध्या वजा ५३ पाणीसाठा आहे. पुण्यात पावसाने पाणीपातळीत एक टक्का वाढ झाली आहे. आषाढीसाठी पाणी सोडल्यास पुन्हा मूळ पातळीवर पाणी जाणार आहे. त्यामुळे पुणे व धरण परिसरात पावसाची नितांत गरज आहे. दुबार पंपिंग सुरूचउजनी जलवाहिनीतून दुबार पंपिंग करून सोलापूरला पाणी आणले जात आहे. यंदा पावसाला विलंब झाल्याने दुबार पंपिंगचे वेळापत्रक वाढले आहे. याचबरोबर पाणी पुरवठा विभागाने मागीलवेळेस सोडलेले पाणी काटकसरीने वापरले आहे. औज बंधाऱ्यात पाणी अडविल्यावर पाठीमागे १२ किलोमीटर पाणी थांबते. यातून कर्नाटकाचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करतात. त्यामुळे यावेळेस चिंचपूर बंधारा रिकामा होईल तसे औज बंधाऱ्यातील पाणी वेगाने रिकामे करण्यात आल्याने जास्त दिवस पाणी पुरले आहे.