शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरला पाणीटंचाई : आषाढी यात्रेसाठी उजनीतून पाणी सोडणार

By admin | Updated: July 5, 2016 20:51 IST

पंढरपूरला आषाढी यात्रेनिमित्त होणारी वारकऱ्यांची गर्दी व सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

आषाढी यात्रेसाठी उजनीतून पाणी सोडणारसोलापूरला पाणीटंचाई: महापालिका दीड कोटी पाणीपट्टी भरणारसोलापूर : पंढरपूरला आषाढी यात्रेनिमित्त होणारी वारकऱ्यांची गर्दी व सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. मंत्रालयात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरच्या संभाव्य पाणी टंचाईबाबत बैठक घेतली. बैठकीला महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम उपस्थित होते. याचवेळी सोलापुरात जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी उजनीतून भीमेत पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अभियंता चौगुले, मनपा पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता राजकुमार रेड्डी उपस्थित होते. औज बंधाऱ्यात १२ दिवस पुरेल इतपत पाणीसाठा आहे. या काळात पाऊस न पडल्यास सोलापूरच्या पाणी पुरवठयाची स्थिती बिकट होणार आहे. संभाव्य पाणीटंचाई ओळखून उजनीतून भीमेत पाणी सोडणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेला दीड कोटी भरावे लागतील असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने दिला. याबाबत पालकमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली. १५ जुलैनंतर होणारी पाणीटंचाई ओळखून महापालिका दोन दिवसात दीड कोटी भरेल असे आयुक्त काळम यांनी सांगितले. आषाढी यात्रेसाठी पाटबंधारे खात्यातर्फे भीमेत पाणी सोडण्यात येणार आहे. याबरोबरच सोलापूरसाठी जादा पाणी सोडण्यात येईल. यातून औज व चिंचपूर बंधारा साडेचार मीटर क्षमतेने भरून दिला जाईल. यातून सोलापूरची पुढील दोन महिन्याची पाण्याची चिंता मिटेल. उजनी धरणात सध्या वजा ५३ पाणीसाठा आहे. पुण्यात पावसाने पाणीपातळीत एक टक्का वाढ झाली आहे. आषाढीसाठी पाणी सोडल्यास पुन्हा मूळ पातळीवर पाणी जाणार आहे. त्यामुळे पुणे व धरण परिसरात पावसाची नितांत गरज आहे. दुबार पंपिंग सुरूचउजनी जलवाहिनीतून दुबार पंपिंग करून सोलापूरला पाणी आणले जात आहे. यंदा पावसाला विलंब झाल्याने दुबार पंपिंगचे वेळापत्रक वाढले आहे. याचबरोबर पाणी पुरवठा विभागाने मागीलवेळेस सोडलेले पाणी काटकसरीने वापरले आहे. औज बंधाऱ्यात पाणी अडविल्यावर पाठीमागे १२ किलोमीटर पाणी थांबते. यातून कर्नाटकाचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करतात. त्यामुळे यावेळेस चिंचपूर बंधारा रिकामा होईल तसे औज बंधाऱ्यातील पाणी वेगाने रिकामे करण्यात आल्याने जास्त दिवस पाणी पुरले आहे.