शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार गावांमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: February 25, 2016 00:35 IST

सलग दोन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पाणी टंचाईने भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जानेवारीत

- राहुल कलाल,  पुणेसलग दोन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पाणी टंचाईने भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जानेवारीत केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील २८५ तालुक्यांमधील १५ हजार ९६० गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी १ ते ४ मीटरपेक्षा जास्तने खालावल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सर्व गावांमध्ये उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सन २०१४ मध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. गेल्यावर्षी २०१५ मध्ये चांगला पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र त्यावर पाणी फिरले आणि राज्यात दुष्काळ जाहीर करावा लागला. पाऊस न पडल्याने राज्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने घटली आहे. आता उन्हाळा येऊ घातल्याने आणि पुरेसा पाणीसाठा नसल्याने भूगर्भातील पाणी हाच प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधील भूजलाची पातळी काय आहे, याचे सर्वेक्षण राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले. त्यात हे भीषण वास्तव समोर आले आहे. भूगर्भातील पाणी एक मीटरपेक्षा खाली गेले तरी तेथील भूजल संपण्याच्या मार्गावर पोहोचले, असा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे या सर्व गावांना उन्हाळ्यात भूगर्भातून पाणी मिळणार नसल्याचे भूजल विभागाने स्पष्ट केले आहे. या जिल्ह्यांंमधील स्थिती गंभीर या सर्वेक्षणात अहमदगनर, बीड, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा आणि सातारा या जिल्ह्यांतील भूजल पातळीची स्थिती गंभीर असल्याचे नोंदविण्यात आले आहे.राज्याच्या विविध भागांमधील भूजलाची पातळी काय आहे, याचे सर्वेक्षण राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले. त्यात हे भीषण वास्तव समोर आले आहे. राज्यातील भूजल पातळीतील घटघटगावे ३ मीटरपेक्षा जास्त घट४,८२८२ ते ३ मीटरपेक्षा जास्त घट३,९५३१ ते २ मीटरपेक्षा जास्त घट७,१७९एकूण१५,९६०