शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईतही सेनेचे मावळे झिंगले

By admin | Updated: June 27, 2014 09:03 IST

अंबरनाथ पूर्व भाग पाणीटंचाईग्रस्त झाला असतानाही लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयी जल्लोषाच्या ओल्या पार्टीत सैनिक झिंगले.

अंबरनाथ : चिखलोली धरण पूर्णत: आटल्याने अंबरनाथ पूर्व भाग हा पाणीटंचाईग्रस्त झाला आहे. तर अंबरनाथच्या या संकटाची जाणीव सर्वाना असतानाही लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयी जल्लोषाच्या ओल्या पार्टीत बुधवारी  १५ हजारांहून अधिक मावळे व्यस्त होते. 
शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणा:या चिखलोली धरणातील पाणीसाठा संपल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. याची कल्पना अंबरनाथच्या सत्ताधारी शिवसैनिकांना आहे. असे असूनही शहरातील शांतीसागर रिसॉर्टमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले होते. निमित्त होते कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीला मिळालेल्या यशाचे. या यशासाठी कार्यकत्र्यानी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांच्यासाठी खास ओली पार्टी आयोजित करण्यात आली होती.
 विशेष म्हणजे या पार्टीत महिलांना बोलाविण्यात आले नव्हते. या पार्टीसाठी कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातील 5 हजार कार्यकत्र्याना निमंत्रित करण्यात आले. मात्र ओली पार्टी म्हटल्यावर काम करणारे मावळे आणि न करणारे कावळेही हजर राहिले. त्यामुळे 5 हजारांचा आकडा 15 हजारांवर गेला. नियोजनापेक्षा कार्यकर्ते तिप्पट झाल्याने जेवणाची आणि मदिरेची बोंबाबोंब झाली. ज्यांना मिळाली त्यांनी ती तिथे तर ढोसलीच शिवाय रिकाम्या बाटलीत पेग भरून घरीही नेली. जेवणासाठी कार्यकत्र्याची तुफान गर्दी झाली होती. 
काहींनी तर उपाशीच घरी येणे पसंत केले. त्यातही काही कार्यकत्र्याचा उत्साह एवढा दांडगा होता की, ते दारूसाठी व जेवणासाठी नवा स्टॉक येईर्पयत थांबले होते. अख्खी शिवसेना त्या पार्टीत सामील झाली होती. नागरिकांच्या हिताच्या मुद्दय़ावर राजकारण करणा:या शिवसेनेला आणि त्यांच्या पदाधिका:यांना अंबरनाथकरांची तहान दिसली नाही. 
या पार्टीला आणि सत्कार समारंभाला शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नरेश म्हस्के, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह अनेक बडे पदाधिकारी उपस्थित होते.