शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अपार्टमेंट्समध्ये पाणीबचतीची मोहीम

By admin | Updated: May 17, 2016 05:50 IST

‘लोकमत’चे जलमित्र अभियान उपक्रमाच्या वृत्तांची दखल घेऊन राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीबचतीसंदर्भात जागरूकता निर्माण होत

मुंबई : ‘लोकमत’चे जलमित्र अभियान उपक्रमाच्या वृत्तांची दखल घेऊन राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीबचतीसंदर्भात जागरूकता निर्माण होत असून, अपार्टमेंट्स, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी वाचविण्याची जणू मोहीमच सुरू झालेली आहे. वाहनधारक आपली वाहने सप्ताहात एकदा किंवा दोनदा केवळ बादलीभर पाण्याचा वापर करून स्वच्छ करीत आहेत; तर घराघरामध्येही पाण्याचा कमीतकमी उपयोग करून कामे उरकली जात आहेत.कोल्हापूर येथील प्रतिभा नगरमधील ‘यश इलिट’च्या सदनिकाधारकांनी दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एक दिवसाआड बादलीतून पाणी घेऊन चारचाकी आणि दुचाकी वाहने धुण्याचा निर्णय घेतला. या सामुदायिक निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. यामुळे पाइपद्वारे वाहने धुण्यामुळे होणारा पाण्याचा बेसुमार अपव्यय टळला आहे. सरासरी ५० टक्के पाण्याची बचत होत आहेसातारा येथे गृहिणींनी पाणीबचतीसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सिंक, बेसिनच्या पाइपची ड्रेनेजला असलेली जोडणी काढून तेथून भाजी किंवा तांब्या-पेले विसळलेले पाणी बादलीत साठवून त्याचा उपयोग गृहनिर्माण सोसायटीमधील बागेला पाणी देण्यासाठी करण्यात येत आहे. नंदा पिसाळ या गृहिणीने त्या करीत असलेला उपाय सांगितला. त्या म्हणाल्या की, घरातील टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये ५ लीटर पाणी बसते. बटण दाबले की सर्व पाणी वाहून जाते. आम्ही टँकमध्ये १ लीटरची प्लॅस्टिकची बाटली ठेवली आहे. त्यामुळे टँकमधील जागा कमी झाल्यामुळे ४ लीटर पाणी बसते आणि १ लीटरची बचत होत आहे.सोलापुरातील होटगी रोड आणि विजापूर रोडवरील अनेक अपार्टमेंट्समध्येही पाणीबचतीसाठी अनेक उपाययोजना केल्याचे दिसून आले. या ठिकाणी घरेलू कामगारांना केवळ एका बादलीत भांडी धुण्याची सूचना दिली आहे. अनेक गृहिणींनी दररोज टॉवेल धुण्यासाठी देण्याचे बंद केल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)वॉटरबॅगेतील पाण्याचे संकलनडॉ. शीतल पाटील फाउंडेशनतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे पारस प्ले अ‍ॅँड प्री-प्रायमरी स्कूल चालविले जाते. शाळेत ५० विद्यार्थी आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनाही पाणीबचतीचे धडे दिले आहेत. शाळा सुटल्यानंतर वॉटर बॅगमधील शिल्लक पाणी एकत्र संकलित करण्याची व्यवस्था दोन महिन्यांपासून केली आहे. अशा प्रकारे संकलित झालेल्या पाण्यातून शाळेतील फरशांची स्वच्छता केली जाते किंवा झाडांना वापरले जात आहे.