शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

जलाशयांची जलसाठ्याची क्षमता घटली, रोबोटिक यंत्राद्वारे गाळ काढणार

By admin | Updated: August 16, 2016 20:56 IST

मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठविण्याची जलाशयांची क्षमता कमी झाली आहे़

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठविण्याची जलाशयांची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांची साफसफाई रोबोटिक यंत्राद्वारे पुन्हा एकदा केली जाणार आहे. या आधुनिक यंत्रामुळे जलाशय रिकामी अथवा पाणीपुरवठा खंडित न करताच ही सफाई होऊ शकणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांतून आलेल्या पाण्याचा साठा जलाशयांमध्ये केला जातो. त्यातूनच पुढे सर्व विभागांना पाणीपुरवठा होत असतो़ मात्र पाण्यातील गाळ व जलवाहिनींमधील गंजाचे कणही याबरोबर जलाशयामध्ये साठत असतात. हा गाळ कालांतराने तळाशी साचून जलाशयांमधील जलसाठ्याची क्षमता कमी होते. २००५ ते २००९ मध्ये पूर्व उपनगरातील सात जलाशय व २००९ ते २०१४ या काळात शहरातील सहा जलाशयांची सफाई रोबोटिक यंत्राद्वारे करण्यात आली. मात्र आधी सफाई झालेल्या जलाशयांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पुन्हा गाळ जमा झाला आहे. त्यामुळे या जलाशयांची तातडीने सफाईची आवश्यकता आहे़ यासाठी ११ कोटी ७६ लाख रुपये पालिका खर्च करणार आहे. यामुळेच सफाईची गरज तानसा, वैतरणा, भातसा या तलावांमधील पाणी जलाशयांमध्ये जमा होत असते. मात्र पाण्याबरोबर गाळ व जलवाहिन्यांचे गंजलेले कणही जलाशयांच्या तळाशी जमा होत असतात़ कालांतराने हे थर वाढून जलाशयांमधील पाणी साठविण्याची क्षमता कमी होत जाते. यामुळेच सफाईची तातडीने गरज आहे, अशी सफाई स्वयंचलित स्वच्छता यंत्र गाळ शोधून उपसण्यासाठी उपयुक्त आहे, यासाठी जलाशय रिकामे अथवा पाणीपुरवठा खंडित न करता जलाशयाच्या तळाशी असलेल्या गाळाची स्थिती व तळाची अवस्था पाहता येते़ तसेच हा गाळ पाण्यात मिसळू न देताच गाळ बाहेर काढणे शक्य होते. गाळ काढण्याच्या प्रक्रियेवर संगणकाद्वारे नियंत्रण ठेवले जाते.