शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

खारघर शहरात पाण्याची समस्या

By admin | Updated: April 6, 2017 02:39 IST

खारघर शहरात मागील महिन्याभरापासून तीव्र पाण्याची समस्या उद्भवली आहे.

पनवेल : खारघर शहरात मागील महिन्याभरापासून तीव्र पाण्याची समस्या उद्भवली आहे. शहराला ७० ते ७५ एमएलडी पाण्याची गरज असताना सिडकोमार्फत केवळ ५० एमएलडी पाण्यावर बोळवण केली जाते. सातत्याने पाठपुरावा करूनसुध्दा ही समस्या जैसे थेच असल्याने खारघरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी खारघर शहरातून जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून खारघर शहराला स्वत:च पाणी सोडले. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच सिडको अधिकाऱ्यांनी तातडीने हा पाणीपुरवठा बंद केला.खारघर शहरात सर्वच वसाहतीत पाण्याची समस्या गंभीर होत असताना सिडको प्रशासन कोणतीच भूमिका घेत नाही. विशेष म्हणजे सिडकोने महानगर पालिकेला जलवाहिन्या टाकण्यासाठी जागा देताना करार केला आहे क ी, जेव्हा सिडको विभागात पाण्याची गरज भासेल तेव्हा आम्ही सिडकोच्या संबंधित विभागाला पाणीपुरवठा करू. मात्र, हा करार केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केला. खारघर शहरातून जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून खारघर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभात पाणी सोडले. विशेष म्हणजे अनेक वर्षे होऊन देखील या ठिकाणाहून खारघर शहराला पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. या जलवाहिनीवर असलेला व्हॉल्व सुरू करून या कार्यकर्त्यांनी माघार घेतली. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करून भाजपा कार्यकर्त्यांनी प्रशासनाला ठेंगा दाखविला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये भाजपा जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, समीर कदम, कीर्ती नवघरे तसेच विजय पाटील यांचा समावेश होता. खारघर शहरात पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या समस्यांचा परिणाम कुटुंबाच्या बजेटवरच होत असल्याने खारघरमधील रहिवाशांसाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. आमच्यावर प्रशासनाने कारवाई केली तरी चालेल असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रकारासंदर्भात नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जसवंत मिस्त्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे येत्या काळात खारघर परिसरातील पाणीप्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)