शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

१४ हजार कोटींच्या उत्पन्नावर पाणी!

By admin | Updated: March 18, 2017 00:53 IST

विक्रीकर, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) आणि परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या अत्यंत सुमार कामगिरीमुळे महाराष्ट्राला यावर्षी तब्बल

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

विक्रीकर, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) आणि परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या अत्यंत सुमार कामगिरीमुळे महाराष्ट्राला यावर्षी तब्बल १३,९७३.९९ कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. मुद्रांक शुल्काचे समजू शकतो पण एक्साईज आणि परिवहनकडून अपेक्षित उत्पन्न का मिळाले नाही याचा अभ्यास केला जाईल आणि येत्या आर्थिक वर्षात या विभागांना दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कठोर देखरेख केली जाईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस अगोदर वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी लोकमतशी विशेष बातचित केली. मावळत्या आर्थिक वर्षात कराशिवायचे उत्पन्न वाढविण्यासाठी जेवढा वेळ द्यायला हवा होता तेवढा आपण देऊ शकलो नाही, ही खंतही त्यांनी व्यक्त केली. नव्या आर्थिक वर्षात ‘नॉन टॅक्स रेव्ह्यून्यू’ वाढविण्यासाठी वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती दर बुधवारी दुपारी ३ ते ५ यावेळेत मंत्रालयात बैठक घेईल आणि ‘खर्चातली बचत म्हणजे उत्पन्नात वाढ’ हे सुत्र अंमलात आणेल, असेही त्यांनी सांगितले.२०१६-१७ मध्ये ५० टक्के अर्थसंकल्पीय रक्कम का खर्च झाली नाही?शेतकऱ्यांसाठी यावर्षी मोठ्या प्रमाणावर तरतुदी करण्यात आली होती. पीक विम्याचे पैसे द्यावे लागल्याने मूळ बजेटला २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे जो काही खर्च करायचा तो ८० टक्के बजेटमधून करायचा होता. आजमितीला दिलेल्या बजेटच्या ८३ टक्के रक्कम खर्च झालेली आहे. यावर्षीपासून योजना व योजनाबाह्य (प्लॅन आणि नॉनप्लॅन) तरतुदी एकत्रित करणार आहात. त्यामुळे प्लॅन अर्थसंकल्प नेमका कितीचा असेल?अर्थसंकल्पाचे योजना व योजनाबाह्य असे दोन प्रकार आहेत. आपल्याकडे योजनाबाह्य खर्च पाहण्याची, तपासण्याची व्यवस्थाच नाही. त्याची आकडेवारीच समोर येत नव्हती. त्यामुळे नॉनप्लॅन बजेटमध्ये काय घडत आहे हे कळत नव्हते. आता हे दोन्ही प्रकार एकत्र केल्याने संपूर्ण आराखड्याला मान्यता घ्यावी लागेल. यामुळे प्रत्येक योजनेवर खर्च होणारे खरे आकडे समोर येतील. यावर्षीचे प्लॅन बजेट नेमके किती आहे याचा आकडा आपण अर्थसंकल्प सादर करताना वेगळा जाहीर करणार आहोत पण पुढच्यावर्षीपासून सगळे बजेट एकत्रच सादर केले जाईल.हे सरकार सतत घोषणा करत आहे. अंमलबजावणीचे काय?तुम्ही म्हणता त्यात काही अंशी तथ्य आहे. पण नवीन काही करायचे तर घोषणा कराव्याच लागतील. आता घोषणा खूप झाल्या. आता हे आर्थिक वर्ष अंमलबजावणीसाठीचे वर्ष म्हणून साजरे केले जाईल. त्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती केली गेली असून ही समिती उत्पन्न वाढीसोबतच अंमलबजावणीचे काय यावरही देखरेख करेल. आपल्याकडे भांडवली गुंतवणूक होत होती पण त्यातल्या अन्य कामांसाठी निधी मिळत नसे, नियोजनाच्या अभावी हे होत होते पण यापुढे असे होणार नाही.यंदाही जनतेवर कर लावून उत्पन्न वाढविणार का? ते तुम्हाला अर्थसंकल्पात कळेलच. पण कर लावून उत्पन्न वाढविण्यावर आता मर्यादा आहेत. यापुढे कराशिवाय उत्पन्न कसे वाढेल याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. शासकीय जमिनी, संपत्तीचा योग्य उपयोग करुन घ्यावा लागेल. त्यादृष्टीने नियोजन चालू आहे.यंदाही तुटीचा अर्थसंकल्प असेल?तूट आहेच पण ती मर्यादित रहावी म्हणूनच आपण २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाला २० टक्के कपात करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. गेल्या १५ वर्षात फक्त दोन वेळा आघाडी सरकारने शिलकी अर्थसंकल्प सादर केला होता. पण त्यात एकावर्षी त्यांनी रोजगार हमी योजनेची रक्कम मूळ बजेटमध्ये आणली होती आणि दुसऱ्यावेळी ३१ मार्च ला जे व्याज सरकारला भरावे लागते ते भरले नव्हते म्हणून शिलकी अर्थसंकल्प सादर करता आला होता. पण ही पळवाट झाली. आम्ही तूट भरुन काढण्यासाठी खर्चावर नियंत्रण आणले. येत्या काळात उत्पनाचे नवे मार्ग या सरकारने हाती घेतल्याचे तुम्हाला पहायला मिळेल.तुम्ही विरोधात असताना पुरवणी मागण्यांवरुन सरकारला धारेवर धरत होता. आता तुमच्या काळात प्लॅन बजेटच्या संख्येएवढ्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या. त्याचे समर्थन कसे कराल?दुष्काळ, गारपिट आणि अवकाळी पाऊस अशा तीनही गोष्टी या एकाच वर्षात आल्या. त्यामुळे आयत्यावेळी अनेक निर्णय घ्यावे लागले. पुरवणी मागण्यांपैकी ८० ते ९० टक्के मागण्या पूर्णत: शेतीशीच संबंधीत होत्या. मार्च महिन्यात ज्या पुरवणी मागण्या आल्या त्या पुस्तकी नोंदीचा (बुक अ‍ॅडजेस्टमेंट) भाग होत्या. त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळे करतोय असे नाही.२०१६-१७ या आर्थिक वर्षातली तुमची जमेची बाजू कोणती ?यावर्षात मी अभयदान योजना जाहीर केली होती. त्यामुळे २५०० कोटींचे उत्पन्न वाढले. हा मोठा बदल मला साध्य करता आला. कृषी विभागाच्या अनेक गोष्टींची खरेदी न करता त्यासाठीचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय झाला. सीएसआर निधीतून मोठ्या प्रमाणावर पैसे शासनाच्या योजनांसाठी उभे करण्यात यश आले.खरेदीच्या दुष्ट चक्रातून सुटका करणार!अनेक विभाग खरेदी टेंडरमध्ये एवढे अडकून गेले आहेत की आपले काम योजना आखणे, त्यांची अंमलबजावणी होते की नाही हे तपासणे आहे हेच काही जण विसरुन गेले आहेत. यापुढे काही विभागांना खरेदीतून मुक्त करण्याचे नियोजन असून खरेदीसाठीचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची योजना आखली जात आहे.विभागअंदाजे उत्पन्नफेब्रु.२०१७ पर्यंतचे २०१६-१७ साठीमिळालेले उत्पन्नविक्रीकर८१,४३७.६९७९,७५२.१८मुद्रांक शुल्क२३,५४७.६६१७,७०२.५६एक्साईज१५,३४३.८६१०,३४९.४८वाहनकर६७५०.००६००१.००आकडे कोटींमध्ये२०१६-१७ साठीचे प्लॅन/नॉनप्लॅन मिळून एकूण बजेट प्रत्यक्षात मिळालेत्यातून खर्च झाले३,०४,४४१.५७६ कोटी२,१०,२५७.३९२ कोटी१,७५,२७४.२७