शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपात रद्द होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:13 IST

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होत असलेले पवना धरण ७८ टक्के भरले आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होत असलेले पवना धरण ७८ टक्के भरले आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधीलही पाणीकपात रद्द व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरात दररोज पाणीपुरवठा करावा, याबाबत महापालिका सभेतही निर्णय होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात मागील पावसाळ्यात केवळ ८० टक्के पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे ९ डिसेंबर २०१५ला शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. त्यानंतर ११ मार्च २०१६ मध्ये १० टक्क्यांवरून ही पाणीकपात १५ टक्क्यांवर नेण्यात आली होती. धरणातील पाणीसाठा घटतच असल्याने २ मे २०१६पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पवना धरणात ७८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यासह मावळ परिसरात जोरदार पाऊसही सुरूच आहे. यामुळे तीन महिन्यांपासून होत असलेला दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करून दररोज पाणीपुरवठा व्हावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेले वर्षभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा सहन करीत असलेल्या पुणेकरांना आता दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी स्तरावर घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा निर्णय, आयुक्तांचे पत्र यावरून हा निर्णय घेण्यात आला. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सभेत नगरसेवक काय भूमिका घेतात. याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आयुक्तांनी मात्र सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे.पाणीपुरवठा नियमित सुरू करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल भोसले व माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी आयुक्त दिनेश वाघमार यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गतवर्षी कमी पाऊस पडला होता. यंदा मात्र पावसाचे प्रमाण चांगले आहे. दमदार पाऊस सुरूअसल्याने पवना धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.(प्रतिनिधी)