शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून जलसमृद्धी

By admin | Updated: October 8, 2016 02:01 IST

पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत जलयुक्त शिवार योजनेबरोबरच तलावामधील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेस अनन्य साधारण यश प्राप्त झाले आहे. गावोगावच्या लोकांच्या श्रमदान मोहिमेतून १५ तालुक्यांतील एकूण ३२ विविध ठिकाणच्या नदी-तळी-तलावांमधील तब्बल ५ लाख २ हजार ७७४ घनमीटर गाळ उपसून काढून हे जलस्रोत स्वच्छ करण्यात आले. या सर्व गाळ उपसण्यामुळे तब्बल ५०२ टीसीएम अशी विक्रमी जलसाठवण क्षमता वृद्धिंगत करुन दाखवण्याची किमया गावोगावच्या ग्रामस्थांनी करुन दाखविली आहे.रायगड जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेबरोबरच जिल्ह्यात असलेल्या तलाव, धरणातील गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांचा विचार करता थोडेसे अवघड वाटणारे काम रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या नेतृत्वाखालील महसूल यंत्रणेने केलेले सुयोग्य नियोजन आणि सामाजिक संस्था व नागरिक यांचा स्वेच्छा सक्रिय सहभाग यामुळे यशस्वी झालेपिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, सिमेंट बंधारे, माती बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव यासारख्या अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्रोतांची जलसाठवण क्षमता पुन:र्स्थापित करणे, जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या ताळेबंधाबाबत जनतेत जाणीव व जागृती निर्माण करणे, गाळ काढण्याचा मोहिमेची उद्दिष्टे सांगून जनसामान्याचा सहभाग वाढवणे असा उद्देश या मोहिमेमागे होता. प्रत्येक तालुक्यामधील तहसीलदार तसेच महसूल यंत्रणा यांनी आपल्या परिसरातील तलाव, धरण यांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर गाळ काढण्यासाठी तलाव व धरणाची निवड केली. लोकांमध्ये याबाबत जागृती करून त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लोकसहभागातून काम करण्यात आले.>गावातील भूजलात वाढजलसाठ्यांची क्षमता वृद्धीकरण झाल्यामुळे गाव क्षेत्रातील भूजलात वाढ झाली आहे. गाळ काढून तो शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली असून मृदसंधारणात वाढ झाली आहे. गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली तर शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड करणे शक्य झाले आहे.