शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

लोकसहभागातून जलसमृद्धी

By admin | Updated: October 8, 2016 02:01 IST

पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत जलयुक्त शिवार योजनेबरोबरच तलावामधील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेस अनन्य साधारण यश प्राप्त झाले आहे. गावोगावच्या लोकांच्या श्रमदान मोहिमेतून १५ तालुक्यांतील एकूण ३२ विविध ठिकाणच्या नदी-तळी-तलावांमधील तब्बल ५ लाख २ हजार ७७४ घनमीटर गाळ उपसून काढून हे जलस्रोत स्वच्छ करण्यात आले. या सर्व गाळ उपसण्यामुळे तब्बल ५०२ टीसीएम अशी विक्रमी जलसाठवण क्षमता वृद्धिंगत करुन दाखवण्याची किमया गावोगावच्या ग्रामस्थांनी करुन दाखविली आहे.रायगड जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेबरोबरच जिल्ह्यात असलेल्या तलाव, धरणातील गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांचा विचार करता थोडेसे अवघड वाटणारे काम रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या नेतृत्वाखालील महसूल यंत्रणेने केलेले सुयोग्य नियोजन आणि सामाजिक संस्था व नागरिक यांचा स्वेच्छा सक्रिय सहभाग यामुळे यशस्वी झालेपिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, सिमेंट बंधारे, माती बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव यासारख्या अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्रोतांची जलसाठवण क्षमता पुन:र्स्थापित करणे, जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या ताळेबंधाबाबत जनतेत जाणीव व जागृती निर्माण करणे, गाळ काढण्याचा मोहिमेची उद्दिष्टे सांगून जनसामान्याचा सहभाग वाढवणे असा उद्देश या मोहिमेमागे होता. प्रत्येक तालुक्यामधील तहसीलदार तसेच महसूल यंत्रणा यांनी आपल्या परिसरातील तलाव, धरण यांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर गाळ काढण्यासाठी तलाव व धरणाची निवड केली. लोकांमध्ये याबाबत जागृती करून त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लोकसहभागातून काम करण्यात आले.>गावातील भूजलात वाढजलसाठ्यांची क्षमता वृद्धीकरण झाल्यामुळे गाव क्षेत्रातील भूजलात वाढ झाली आहे. गाळ काढून तो शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली असून मृदसंधारणात वाढ झाली आहे. गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली तर शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड करणे शक्य झाले आहे.