शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

जलसंधारणामुळे टंचाई निवारण शक्य

By admin | Updated: March 6, 2017 02:18 IST

जलसंधारणाच्या कामामुळे आणि गावाच्या एकीमुळे हे शक्य झाले.

नारायणपूर : जलसंधारणाच्या कामामुळे आणि गावाच्या एकीमुळे हे शक्य झाले. हाच आदर्श इतर गावांनी घेऊन जलसंधारणाची मोहीम राबवून गावे टंचाईमुक्त आणि टँकरमुक्त करावीत, असे आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे उपसचिव गोपाळ साधवानी यांनी केले. तसेच पानवडी गावाने एकजुटीने केलेल्या कामाचेही त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. पानवडी येथील पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यात केलेल्या जलसंधारणाच्या कामांची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे उपसचिव गोपाळ साधवानी आणि रूपक चौधरी यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलसंधारणाच्या कामाबरोबरच इतर कामाचीही पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समिती सदस्या नलिनी लोळे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, प्रांताधिकारी संजय आसवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, छोटे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भोसले, माजी सरपंच हरिभाऊ लोळे, उपसरपंच संदीप भिसे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती लोळे, सुषमा भिसे, अनिता लोळे, मंगल धीवार, आबा लोळे, सोसायटी चेअरमन रामदास भिसे, ग्रामसेविका सुनीता संकपाळ, काळदरीचे ग्रामसेवक शशांक सावंत, कृषी पर्यवेक्षक दिलीप जाधव, गंगाराम जाधव , तंटामुक्ती अध्यक्ष अमोल लोळे उपस्थित होते. या वेळी राजे शिवराय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळाच्या माध्यामातून आणि पारंपरिक ढोल-लेझीम खेळ सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर पथकाने वडाचीवाडी स्मशानभूमी लगतच्या सिमेंट बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन केले. तसेच भिसेवाडी येथील तलावातील गाळ काढलेल्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत सदस्या सुषमा भिसे, रामदास भिसे, सायली भिसे यांनी आपल्या मनोगतात गावात राबविलेल्या विकासकामांची माहिती दिली. माजी सरपंच हरिभाऊ लोळे यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)>३५ जिल्हे : फक्त पुण्याची निवडजलसंधारणाबरोबरच गतिमान प्रशासन चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल संपूर्ण राज्यातील ३५ जिल्ह्यांतून एकमेव पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढील टप्प्यात संपूर्ण देशातून निवड करण्यात येणार असून, उत्कृष्टपणे विकासकामे करून आदर्श ठरणाऱ्या गावांना पंतप्रधान कार्यालयामार्फ त पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील कामांची पाहणी करण्यात आल्याचे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.