शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

जलसंधारणामुळे टंचाई निवारण शक्य

By admin | Updated: March 6, 2017 02:18 IST

जलसंधारणाच्या कामामुळे आणि गावाच्या एकीमुळे हे शक्य झाले.

नारायणपूर : जलसंधारणाच्या कामामुळे आणि गावाच्या एकीमुळे हे शक्य झाले. हाच आदर्श इतर गावांनी घेऊन जलसंधारणाची मोहीम राबवून गावे टंचाईमुक्त आणि टँकरमुक्त करावीत, असे आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे उपसचिव गोपाळ साधवानी यांनी केले. तसेच पानवडी गावाने एकजुटीने केलेल्या कामाचेही त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. पानवडी येथील पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यात केलेल्या जलसंधारणाच्या कामांची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे उपसचिव गोपाळ साधवानी आणि रूपक चौधरी यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलसंधारणाच्या कामाबरोबरच इतर कामाचीही पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समिती सदस्या नलिनी लोळे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, प्रांताधिकारी संजय आसवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, छोटे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भोसले, माजी सरपंच हरिभाऊ लोळे, उपसरपंच संदीप भिसे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती लोळे, सुषमा भिसे, अनिता लोळे, मंगल धीवार, आबा लोळे, सोसायटी चेअरमन रामदास भिसे, ग्रामसेविका सुनीता संकपाळ, काळदरीचे ग्रामसेवक शशांक सावंत, कृषी पर्यवेक्षक दिलीप जाधव, गंगाराम जाधव , तंटामुक्ती अध्यक्ष अमोल लोळे उपस्थित होते. या वेळी राजे शिवराय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळाच्या माध्यामातून आणि पारंपरिक ढोल-लेझीम खेळ सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर पथकाने वडाचीवाडी स्मशानभूमी लगतच्या सिमेंट बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन केले. तसेच भिसेवाडी येथील तलावातील गाळ काढलेल्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत सदस्या सुषमा भिसे, रामदास भिसे, सायली भिसे यांनी आपल्या मनोगतात गावात राबविलेल्या विकासकामांची माहिती दिली. माजी सरपंच हरिभाऊ लोळे यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)>३५ जिल्हे : फक्त पुण्याची निवडजलसंधारणाबरोबरच गतिमान प्रशासन चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल संपूर्ण राज्यातील ३५ जिल्ह्यांतून एकमेव पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढील टप्प्यात संपूर्ण देशातून निवड करण्यात येणार असून, उत्कृष्टपणे विकासकामे करून आदर्श ठरणाऱ्या गावांना पंतप्रधान कार्यालयामार्फ त पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील कामांची पाहणी करण्यात आल्याचे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.