शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

अतिवृष्टीमुळे चिरनेर गावात पुराचे पाणी

By admin | Updated: September 18, 2016 01:44 IST

शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नाला ओसडून वाहू लागला.

उरण : शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नाला ओसडून वाहू लागला. गावात उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नाल्या काठावरील अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले. यावेळी गावातील रहिवाशी हे निद्रावस्थेत असल्याने गावात खळबळ माजली. गावात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. उरण तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिध्द चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. यावर शासनाने उपाय योजना करावी तसेच चिरनेर गावातील मध्ये भागातून वाहत जाणाऱ्या नाल्याचे काम शासनाने हाती घ्यावे अशी मागणी वारंवार चिरनेर गावातील ग्रामस्थ करीत आहेत. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे चिरनेर गावातील नाल्याचा प्रश्न पडून राहिल्याने चिरनेर गावातील रहिवाशांना दरवर्षीच्या पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे तसेच आर्थिक नुकसान सहन करावा लागला आहे. शुक्रवारी मध्यरात्री चिरनेर गावातील रहिवाशी गाढ झोपलेले असताना मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नलाा ओसडून वाहू लागला. नाल्याला उद्भवणाऱ्या पुरपरिस्थितीतमुळे चिरनेर गावातील नारायण खारपाटील, वैजंता म्हात्रे, अशोक मोकल सारख्या अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले यावेळी गावात खळबळ माजली. चिरनेर गावातील ग्रामस्थांनी पुरात अडकलेल्या रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले आहे. त्यामुळे जिवीतहानी टळली असली तरी रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भात उरण तालुक्याच्या तहसिलदार कल्पना गोडे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की उरणता लुक्यात सरासरी पेक्षा १७९ मि. मी. पाऊस पडला आहे. तालुक्यातील गावांचा पुरपरिस्थिती संदर्भात आढावा घेतला जात आहे. ज्या रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यांच्या नुकसानी संदर्भात महसूल विभागाचे कर्मचारी पंचनामे करीत आहेत. तालुक्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतू चिरनेर गावातील ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तशा प्रकारचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार कल्पना गोडे यांनी उरणकराना केले आहे. (प्रतिनिधी)>शॉक लागून दांपत्याचा मृत्यूचिरनेर गावात मध्यरात्रीच्या सुमारास उदभवलेल्या पूर परिस्थितीमध्ये गावातील रहिवाशी रामकृष्ण नारंगीकर व त्यांची पत्नी यांचा घरात शिरलेल्या पूराच्या पाण्यात शॉक लागून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. घरात पाणी शिरल्याने लोखंडी जीन्यात विद्युत प्रवाह शिरल्याने विजेच्या धक्क्याने या दुर्दैवी पती - पत्नीच ेनिधन झाले. त्यांचे घर बंद अवस्थेत असल्याने झाला प्रकार उशिराने कळल्याची माहिती उरण तहसिलदार कल्पना गोडे यांनी दिली. दरम्यान रामकृष्ण नारंगीकर व त्यांच्या पत्नीच्या दु:ख निधनाबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.