शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे चिरनेर गावात पुराचे पाणी

By admin | Updated: September 18, 2016 01:44 IST

शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नाला ओसडून वाहू लागला.

उरण : शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नाला ओसडून वाहू लागला. गावात उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नाल्या काठावरील अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले. यावेळी गावातील रहिवाशी हे निद्रावस्थेत असल्याने गावात खळबळ माजली. गावात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. उरण तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिध्द चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. यावर शासनाने उपाय योजना करावी तसेच चिरनेर गावातील मध्ये भागातून वाहत जाणाऱ्या नाल्याचे काम शासनाने हाती घ्यावे अशी मागणी वारंवार चिरनेर गावातील ग्रामस्थ करीत आहेत. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे चिरनेर गावातील नाल्याचा प्रश्न पडून राहिल्याने चिरनेर गावातील रहिवाशांना दरवर्षीच्या पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे तसेच आर्थिक नुकसान सहन करावा लागला आहे. शुक्रवारी मध्यरात्री चिरनेर गावातील रहिवाशी गाढ झोपलेले असताना मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नलाा ओसडून वाहू लागला. नाल्याला उद्भवणाऱ्या पुरपरिस्थितीतमुळे चिरनेर गावातील नारायण खारपाटील, वैजंता म्हात्रे, अशोक मोकल सारख्या अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले यावेळी गावात खळबळ माजली. चिरनेर गावातील ग्रामस्थांनी पुरात अडकलेल्या रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले आहे. त्यामुळे जिवीतहानी टळली असली तरी रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भात उरण तालुक्याच्या तहसिलदार कल्पना गोडे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की उरणता लुक्यात सरासरी पेक्षा १७९ मि. मी. पाऊस पडला आहे. तालुक्यातील गावांचा पुरपरिस्थिती संदर्भात आढावा घेतला जात आहे. ज्या रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यांच्या नुकसानी संदर्भात महसूल विभागाचे कर्मचारी पंचनामे करीत आहेत. तालुक्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतू चिरनेर गावातील ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तशा प्रकारचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार कल्पना गोडे यांनी उरणकराना केले आहे. (प्रतिनिधी)>शॉक लागून दांपत्याचा मृत्यूचिरनेर गावात मध्यरात्रीच्या सुमारास उदभवलेल्या पूर परिस्थितीमध्ये गावातील रहिवाशी रामकृष्ण नारंगीकर व त्यांची पत्नी यांचा घरात शिरलेल्या पूराच्या पाण्यात शॉक लागून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. घरात पाणी शिरल्याने लोखंडी जीन्यात विद्युत प्रवाह शिरल्याने विजेच्या धक्क्याने या दुर्दैवी पती - पत्नीच ेनिधन झाले. त्यांचे घर बंद अवस्थेत असल्याने झाला प्रकार उशिराने कळल्याची माहिती उरण तहसिलदार कल्पना गोडे यांनी दिली. दरम्यान रामकृष्ण नारंगीकर व त्यांच्या पत्नीच्या दु:ख निधनाबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.