शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

अतिवृष्टीमुळे चिरनेर गावात पुराचे पाणी

By admin | Updated: September 18, 2016 01:44 IST

शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नाला ओसडून वाहू लागला.

उरण : शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नाला ओसडून वाहू लागला. गावात उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नाल्या काठावरील अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले. यावेळी गावातील रहिवाशी हे निद्रावस्थेत असल्याने गावात खळबळ माजली. गावात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. उरण तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिध्द चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. यावर शासनाने उपाय योजना करावी तसेच चिरनेर गावातील मध्ये भागातून वाहत जाणाऱ्या नाल्याचे काम शासनाने हाती घ्यावे अशी मागणी वारंवार चिरनेर गावातील ग्रामस्थ करीत आहेत. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे चिरनेर गावातील नाल्याचा प्रश्न पडून राहिल्याने चिरनेर गावातील रहिवाशांना दरवर्षीच्या पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे तसेच आर्थिक नुकसान सहन करावा लागला आहे. शुक्रवारी मध्यरात्री चिरनेर गावातील रहिवाशी गाढ झोपलेले असताना मुसळधार पावसामुळे चिरनेर गावातील नलाा ओसडून वाहू लागला. नाल्याला उद्भवणाऱ्या पुरपरिस्थितीतमुळे चिरनेर गावातील नारायण खारपाटील, वैजंता म्हात्रे, अशोक मोकल सारख्या अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले यावेळी गावात खळबळ माजली. चिरनेर गावातील ग्रामस्थांनी पुरात अडकलेल्या रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले आहे. त्यामुळे जिवीतहानी टळली असली तरी रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भात उरण तालुक्याच्या तहसिलदार कल्पना गोडे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की उरणता लुक्यात सरासरी पेक्षा १७९ मि. मी. पाऊस पडला आहे. तालुक्यातील गावांचा पुरपरिस्थिती संदर्भात आढावा घेतला जात आहे. ज्या रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यांच्या नुकसानी संदर्भात महसूल विभागाचे कर्मचारी पंचनामे करीत आहेत. तालुक्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतू चिरनेर गावातील ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तशा प्रकारचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार कल्पना गोडे यांनी उरणकराना केले आहे. (प्रतिनिधी)>शॉक लागून दांपत्याचा मृत्यूचिरनेर गावात मध्यरात्रीच्या सुमारास उदभवलेल्या पूर परिस्थितीमध्ये गावातील रहिवाशी रामकृष्ण नारंगीकर व त्यांची पत्नी यांचा घरात शिरलेल्या पूराच्या पाण्यात शॉक लागून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. घरात पाणी शिरल्याने लोखंडी जीन्यात विद्युत प्रवाह शिरल्याने विजेच्या धक्क्याने या दुर्दैवी पती - पत्नीच ेनिधन झाले. त्यांचे घर बंद अवस्थेत असल्याने झाला प्रकार उशिराने कळल्याची माहिती उरण तहसिलदार कल्पना गोडे यांनी दिली. दरम्यान रामकृष्ण नारंगीकर व त्यांच्या पत्नीच्या दु:ख निधनाबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.