शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

बियाणे विक्रेत्यांवर वॉच!

By admin | Updated: May 28, 2014 01:03 IST

मान्सूनची चाहूल लागताच शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मशागत करून शेतीला पेरणीसाठी सज्ज केले आहे. आता केवळ मान्सूनची प्रतीक्षा आहे. पुढील जून महिन्यात त्याचे

गुण नियंत्रण विभागाची शोधमोहीम : स्पेशल स्क्वॉड सज्ज

जीवन रामावत - नागपूर

मान्सूनची चाहूल लागताच शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मशागत करून शेतीला पेरणीसाठी सज्ज केले आहे. आता केवळ मान्सूनची प्रतीक्षा आहे. पुढील जून महिन्यात त्याचे आगमन होताच पेरणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी खत व बियाण्यांची जोमाने खरेदी सुरू झाली आहे. शेतकर्‍यांची खत व बियाण्यांच्या दुकानात गर्दी वाढू लागली आहे. मात्र या घाईगर्दीत कुणी शेतकर्‍यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करू नये, यासाठी कृषी विभागाने बियाणे विक्रेत्यांवर करडी नजर रोखली आहे.

विशेष म्हणजे, यंदा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गतवर्षी अतवृष्टीमुळे विदर्भातील सोयाबीन पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांना पेरणीसाठी सोयाबीन बियाणे उपलब्ध होईल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी यापूर्वीच यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र कमी होऊ न कापसाचे क्षेत्र वाढण्याचे भाकीत केले आहे. गतवर्षीची आकडेवारी पाहता, नागपूर विभागात ४ लाख २२ हजार ५४४ हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड झाली होती. त्यासाठी १ लाख ९५ हजार ४४८ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. शिवाय यंदा ३ लाख ७८ हजार ३५0 हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड होण्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. त्यासाठी २ लाख ८३ हजार ४७0 क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्यास व्यापार्‍यांकडून त्याचा काळाबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु कृषी विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी अशा व्यापार्‍यांवर नजर रोखून बसले आहेत; शिवाय दुकानांची तपासणी करून बियाण्यांचे नमुने गोळा केले जात आहेत.

७0 भरारी पथके

कृषी विभागाने बोगस बियाणे विक्रेत्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी विभागाने ७0 भरारी पथके सज्ज केली आहेत. यामध्ये सुमारे ५३0 अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला. याशिवाय सोयाबीनसाठी विशेष कक्षही तयार करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून सोयाबीनसंबंधीच्या सर्व तक्रारी स्वीकारून त्यांचे निराकरण केले जाणार आहे. या कक्षाची एका वरिष्ठ कृषी अधिकार्‍यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

२९ जणांविरुद्ध न्यायालयीन खटले

गतवर्षी कृषी विभागाने नागपूर जिल्ह्यात एकूण ६६५ बियाण्यांचे नमुने घेऊन त्यांचे परीक्षण केले असता ३३ नमुने अप्रमाणित आढळून आले होते. त्यापैकी १९ नमुने ताकीदयोग्य असल्याने संबंधित कंपनी व विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली होती; शिवाय १४ लोकांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्यात आली. याशिवाय रासायनिक खतांचे एकूण ४0७ नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ५४ नमुने अप्रमाणित आढळून आले होते. त्यानुसार ३८ कंपन्या व विक्रेत्यांना ताकीद देउन, इतर १५ लोकांविरुद्ध कठोर न्यायालयीन कारवाई करण्यात आली होती. अशाप्रकारे गतवर्षी एकूण २९ लोकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले.

अशी झाली कारवाई

कृषी विभागाच्या माहितीनुसार, गतवर्षी हिंगणा तालुक्यातील एमआयडीसीमधील मे. फिस्ट्रल हिंक्स विरुद्ध कृषक वापरासाठी असलेल्या युरिया खताची अवैध साठवणूक व वापर केल्याप्रकरणी ७४ बॅग खत जप्त करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यात आरोपीला अटकही झाली होती. तसेच नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील मे. धरती अँग्रो एजन्सीज व मे. कृषी मित्र यांनी बीटी कापूस बियाण्यांची अधिक दराने विक्री केल्याप्रकरणी १ लाख ८३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. शिवाय कुही तालुक्यातील मे. श्रेयस कृषी सेवा केंद्र यांनी मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा दुकानात ठेवून त्याची विक्री केल्याप्रकरणी ५७ हजार रुपयांचा माल जप्त करून कारवाई करण्यात आली होती.