शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

सांडपाणी प्रक्रिया करून उद्योगांना देणार

By admin | Updated: November 25, 2015 04:01 IST

कारखाने, एमआयडीसी तसेच इतर मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना नदी अथवा धरणासारख्या जलस्रोतातील पाणी थेट दिले जाणार नाही़ त्याऐवजी नगरपालिका किंवा महापालिकांचे सांडपाणी प्रक्रिया करून दिले जाईल़

सोलापूर : कारखाने, एमआयडीसी तसेच इतर मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना नदी अथवा धरणासारख्या जलस्रोतातील पाणी थेट दिले जाणार नाही़ त्याऐवजी नगरपालिका किंवा महापालिकांचे सांडपाणी प्रक्रिया करून दिले जाईल़ उद्योग आणि सांडपाणी पुनर्वापराबाबत शासन पातळीवर धोरण निश्चित केले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढील दोन वर्षांत किमान ५ महापालिकांमध्ये १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़ मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली़एनटीपीसी प्रकल्पासाठी उजनीतून पाणी घेण्यासाठी जलवाहिनी टाकली आहे़ तिचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल. प्रक्रिया करूनच एनटीपीसीला हव्या त्या पद्धतीच्या गुणवत्तेचे पाणी देण्याचा निर्णय एनटीपीसीनेदेखील तत्त्वत: मंजूर केला आहे़ त्यामुळे आता मनपा आणि एनटीपीसी यांच्यात एक सामंजस्य करार होईल़ हेच मॉडेल राज्यभरात वापरले जाईल, असे त्यांनी सांगितले. सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यास नदीचे प्रदूषणदेखील रोखता येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)हागणदारीमुक्त नगरपालिका आणि महापालिकांसाठी २ टक्के व्याजाने ३० वर्षांसाठी कर्ज देण्यासाठी एक कंपनी स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले़ पुणे जिल्ह्यातील धरणांतून १० टीएमसी पाणी उजनीमध्ये सोडण्याच्या निर्णयाचे पालन होईल, असेही ते म्हणाले. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी समितीतर्फे मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपुर्द केला़