शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वाशिम जिल्हा महाराष्ट्रात अव्वल

By admin | Updated: July 21, 2014 22:24 IST

निर्मल भारत अभियान : अनुदान वाटपासह शौचालय बांधकामातही आघाडी

वाशिम : निर्मल भारत अभियानच्या पायाभूत सर्वेक्षण ऑनलाईन करणार्‍यांमध्ये वाशिम जिल्हा सध्या महाराष्ट्रात अव्वल आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून थकीत असलेल्या शौचालय अनुदानाचे वाटप आणि नविन शौचालय बांधकामालाही गती आली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार निर्मल भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ांमध्ये सन २0१२-१३ मध्ये पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. सुरुवातीला आकड्यात केलेल्या या सर्वेक्षणाची माहिती आता ऑनलाईनद्वारे केंद्र शासनाला सादर करावयी आहे. शौचालय सुविधा असलेल्या व नसलेल्या राज्यातील १ कोटी २५ लाख कुटुंबाचा यामध्ये समावेश असून या सर्व कुटुंबाची सविस्तर माहिती ३१ जुलै २0१४ पर्यंत ऑन लाईन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार वाशिम जिल्हय़ातील पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत निर्मल भारत अभियान कक्षाच्यावतीने नियोजन करुन शासनाच्या निर्देशानुसार जिल्हय़ातील ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षातील डाटा एन्ट्री ऑपरेटर व बीआरसी यांच्या मदतीने या कामाला गती दिली. एकूण २ लाख १७ हजार ८९७ उद्दिष्टापैकी सद्यस्थितीत (दि. १३ जुलै१४ पर्यंत) जिल्हय़ातील ७६ हजार ३११ कुटुंबांची माहिती ऑनलाईन करण्यात आली आहे. निर्मल भारत अभियानमधून मागील वर्षी शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचे प्रलंबित असलेले अनुदान वाटपात तसेच तालुक्यांमध्ये गती आली असुन सध्या जवळपास ७८ टक्के काम झाले आहे. यासाठी तालुकास्तरावरील बीआरसी कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचप्रमाणे चालू (सन २0१४-१४) वर्षातील टार्गेटनुसार मागील तीन महिन्यात शौचालय बांधकामाचे ३८ टक्के साध्य केले आहे.