शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला वारकरी!

By admin | Updated: June 12, 2016 01:56 IST

चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात आता शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या कुटुंबांच्या मदतीला मंठा तालुक्यातील एक वारकरी धावून आला आहे. या कुटुंबीयांना

- राजेश भिसे, जालना

चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात आता शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या कुटुंबांच्या मदतीला मंठा तालुक्यातील एक वारकरी धावून आला आहे. या कुटुंबीयांना मोफत बियाणे, नांगरणी आणि पेरणी करून देण्याची तयारी या वारकऱ्याने केली आहे. त्र्यंबकराव बोराडे असे या वारकऱ्याचे नाव. त्र्यंबकबापू यांचा जन्म मंठा तालुक्यातील बोराडे पाटोद्याचा. दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकबापू यांनी पत्नीसह चारधाम केले होते. त्यानंतर, मावंदे (तीर्थस्थळी जाऊन आल्यानंतर करावयाचा धार्मिक विधी) करण्याचे त्यांनी ठरविले. या कार्यक्रमासाठी २ लाख रुपयांचा खर्च त्यांना सांगण्यात आला. आधीच दुष्काळ त्यात इतका पैसा खर्च करणे योग्य नसल्याचे त्यांचे मत बनले. त्यांनी हा कार्यक्रम रद्द करून या पैशांतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार, आईच्या नावाने त्यांनी सरस्वती प्रतिष्ठान स्थापन केले. गतवर्षी मंठा आणि सेलू तालुक्यातील ५ एकरपर्यंत शेती असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटुंबीयांची ३०९ एकर शेती नांगरणी आणि पेरणी करून दिली, तसेच मोफत खत आणि बियाणेही दिले. यंदाही मंठा तालुक्यातील ११ आणि सेलू तालुक्यातील १४ अशी २५ शेतकऱ्यांची जवळपास १२६ एकर शेतजमीन यंदा त्र्यंबकबापू नांगरून देणार आहेत, तर आतापर्यंत मोफत खत व बियाणे घरपोच करण्यात आले आहे. त्र्यंबकबापू यांच्याकडे १ ट्रॅक्टर व इतर शेतीऔजारे असून, याच्या आधारे ते इतर शेतकऱ्यांची जमीन नांगरून देतात. निर्व्यसनी आणि मांसाहार न करणाऱ्या शेतकऱ्यांची मदत करण्याचा निर्धार दोन वर्षांपूर्वी केला होता. त्यानुसार, गतवर्षी व यंदा तहसीलदारांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी घेतली आहे. या यादीनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. - त्र्यंबकबापू बारोडे, प्रगतशील शेतकरी, सेलू