शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला वारकरी!

By admin | Updated: June 12, 2016 01:56 IST

चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात आता शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या कुटुंबांच्या मदतीला मंठा तालुक्यातील एक वारकरी धावून आला आहे. या कुटुंबीयांना

- राजेश भिसे, जालना

चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात आता शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या कुटुंबांच्या मदतीला मंठा तालुक्यातील एक वारकरी धावून आला आहे. या कुटुंबीयांना मोफत बियाणे, नांगरणी आणि पेरणी करून देण्याची तयारी या वारकऱ्याने केली आहे. त्र्यंबकराव बोराडे असे या वारकऱ्याचे नाव. त्र्यंबकबापू यांचा जन्म मंठा तालुक्यातील बोराडे पाटोद्याचा. दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकबापू यांनी पत्नीसह चारधाम केले होते. त्यानंतर, मावंदे (तीर्थस्थळी जाऊन आल्यानंतर करावयाचा धार्मिक विधी) करण्याचे त्यांनी ठरविले. या कार्यक्रमासाठी २ लाख रुपयांचा खर्च त्यांना सांगण्यात आला. आधीच दुष्काळ त्यात इतका पैसा खर्च करणे योग्य नसल्याचे त्यांचे मत बनले. त्यांनी हा कार्यक्रम रद्द करून या पैशांतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार, आईच्या नावाने त्यांनी सरस्वती प्रतिष्ठान स्थापन केले. गतवर्षी मंठा आणि सेलू तालुक्यातील ५ एकरपर्यंत शेती असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटुंबीयांची ३०९ एकर शेती नांगरणी आणि पेरणी करून दिली, तसेच मोफत खत आणि बियाणेही दिले. यंदाही मंठा तालुक्यातील ११ आणि सेलू तालुक्यातील १४ अशी २५ शेतकऱ्यांची जवळपास १२६ एकर शेतजमीन यंदा त्र्यंबकबापू नांगरून देणार आहेत, तर आतापर्यंत मोफत खत व बियाणे घरपोच करण्यात आले आहे. त्र्यंबकबापू यांच्याकडे १ ट्रॅक्टर व इतर शेतीऔजारे असून, याच्या आधारे ते इतर शेतकऱ्यांची जमीन नांगरून देतात. निर्व्यसनी आणि मांसाहार न करणाऱ्या शेतकऱ्यांची मदत करण्याचा निर्धार दोन वर्षांपूर्वी केला होता. त्यानुसार, गतवर्षी व यंदा तहसीलदारांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी घेतली आहे. या यादीनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. - त्र्यंबकबापू बारोडे, प्रगतशील शेतकरी, सेलू