शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
2
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
3
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
5
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
6
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
7
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
8
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
9
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
10
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
11
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
12
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
13
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
14
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
15
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
16
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
17
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
18
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
19
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!

सीमेवर युद्धसज्जता!

By admin | Updated: September 30, 2016 02:49 IST

काश्मीरच्या उरीमधील दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात बुधवारी रात्री भारताद्वारे पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या

नवी दिल्ली/चंदिगढ/मुंबई : काश्मीरच्या उरीमधील दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात बुधवारी रात्री भारताद्वारे पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या (आयबी) सहा जिल्ह्यांमधील दहा किमीच्या परिसरातील गावे रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशातील सर्व नौदलाच्या हवाई दलाच्या तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर पंजाब, राजस्थान, जम्मू व काश्मीर येथील सीमांवरील सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयानंतर पंजाबच्या पाक सीमेवरील लोकांनी गावे सोडण्यास सुरुवात केली असून, त्यांची अन्यत्र राहण्याची सोय करण्यात येत आहे. काहींनी मात्र अन्य नातेवाईकांकडे आसरा घेण्याचे ठरवले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था)पर्यटकांसाठीचे कार्यक्रमही रद्दसीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) वाघा सीमेवर नियमित होणारा बिटिंग रिट्रीट कार्यक्रमही रद्द केला आहे. मुंबईत १ व २ आॅक्टोबर रोजी नौदलाने लहान मुले, एनसीसी विद्यार्थी तसेच पर्यटक यांच्यासाठी नौदलाच्या बोटींवर आयोजित केलेले कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्षकाश्मीरमध्ये पाकच्या सीमेनजीक राहणाऱ्या लोकांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रशासनाला दिले आहेत. सर्जिकल स्ट्राइकची प्रतिक्रिया या भागात उमटेल, अशी भीती मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी लष्कर वा तेथील दहशतवादी यांच्या हालचालींवर बीएसएफ, लष्कर व प्रशासन लक्ष ठेवून आहे.