शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जागेमुळे मेट्रो-३ चा खोळंबा

By admin | Updated: June 16, 2016 01:47 IST

मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि रिजन्सी हॉटेलमधील भूखंड वादामुळे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाचा खोळंबा झाला आहे. या भूखंडावरच मेट्रोला व्हेंटिलेशन युनिट उभारायचे असून या भूखंडाखालूनच

- दीप्ती देशमुख,  मुंबई

मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि रिजन्सी हॉटेलमधील भूखंड वादामुळे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाचा खोळंबा झाला आहे. या भूखंडावरच मेट्रोला व्हेंटिलेशन युनिट उभारायचे असून या भूखंडाखालूनच भूमिगत मेट्रो जाणार आहे. विमानतळ प्राधिकरण आणि हॉटेलमधील वाद १९९० पासून सुरू असल्याने मेट्रो ३ च्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला भूखंड देण्याची संमती विमानतळ प्राधिकरण आणि हॉटेलला देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारा अर्ज एमएमआरडीएने उच्च न्यायालयात दाखल केला आहे. विमानतळाच्या भोवताली असलेल्या ३१,००० चौ. मी. भूखंडावरून मुंबई विमानतळ प्राधिकरण व रिजन्सी हॉटेलमध्ये वाद सुरू आहे. १९९० मध्ये या प्रकरणी दावाही दाखल करण्यात आला आहे. मात्र हा दावा अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने यामध्ये अंतरिम दिलासा देताना संबंधित भूखंडाचा तात्पुरता ताबा विमानतळ प्राधिकरणाकडे दिला. मात्र या भूखंडावर कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मनाई केली. तसेच हा भूखंड हस्तांतरित करण्यास व तिसऱ्या पक्षाचे अधिकार निर्माण करण्यास प्रतिबंध घातला. याच भूखंडावर कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ चे व्हेंटिलेशन युनिट आणि भूमिगत मेट्रो जाणार असल्याने एमएमआरडीएची पंचाईत झाली आहे. मेट्रो- ३ चा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो वळवता येणार नाही. कारण हा मार्ग थेट विमानतळाला जोडणारा आहे. तसेच ज्या भागात वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी मेट्रो-३ पोहोचणार असल्याने हा प्रकल्प एमएमआरडीएला पूर्ण करायचा आहे.भूखंड देण्यास विमानतळ प्राधिकरणाने संमती दिली असली तरी रिजन्सी हॉटेलने आडमुठी भूमिका घेतली आहे. भूखंड हवा असल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीएऐवजी विमानतळ प्राधिकरणाने अर्ज करावा, अशी भूमिका रिजन्सी हॉटेलने घेतली आहे. त्यामुळे एमएमआरडीएने विमानतळ प्राधिकरण आणि रिजन्सी हॉटेलच्या दाव्यामध्ये नोटीस आॅफ मोशन दाखल केले आहे. मात्र या प्रकरणात उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने एमएमआरडीएला न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र या वादामध्ये हा प्रकल्प टांगणीवर ठेवणे योग्य नाही. एमएमआरडीएला व्हेंटिलेशन युनिटसाठी वादग्रस्त भूखंडातील १९६ चौ.मी. भूखंड हवा आहे. तसेच भूमिगत मेट्रोसाठी पाच वर्षांकरिता १४, ३०४ चौ.मी. भूखंड हवा आहे. पाच वर्षांनंतर संबंधित भूखंड परत ताब्यात देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक नुकसानभरपाई एमएमआरडीए देण्यास तयार आहे,’ असा युक्तिवाद एमएमआरडीएच्या वतीने अ‍ॅड. किरण बगालिया यांनी केला. विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने वकील केव्हीक सेटलवाड यांनीही हा प्रकल्प टांगणीवर ठेवला जाऊ शकत नाही, असे म्हणत एमएमआरडीएलाभूखंड देण्याची सहमती दर्शवली, तर रिजन्सी हॉटेलच्या वकिलाने आक्षेप घेतला. भविष्यात कोणीही थोडा भूखंड मागत राहील आणि मग यावरून आपला हक्क उरणार नाही, अशी भीती न्यायालयापुढे व्यक्त केली. त्यावर खंडपीठाने एमएमआरडीएला किती रुपये नुकसानभरपाई न्यायालयात जमा करण्यास तयार आहात, अशी विचारणा केली. ‘ज्या वेळी या दाव्यावर निर्णय होईल, तेव्हा ती रक्कम संबंधित पक्षाला देऊ,’ असे म्हणत न्यायालयाने एका आठवड्यात अ‍ॅड. बगालिया यांना एमएमआरडीएकडून सूचना घेण्याचे निर्देश दिले. जनहितासाठी महत्त्वाचा प्रकल्प- एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, मेट्रो-३ हा प्रकल्प जनहितासाठी अत्यंत महत्त्वाचा असून विमानतळ प्राधिकरण आणि हॉटेलच्या वादामुळे हा प्रकल्प रखडला आहे. जपानमधील अभियंते या प्रकल्पासाठी बोलावले असून या वादामुळे या प्रकल्पाची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. मेट्रो अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅक्ट अंतर्गत एमएमआरडीएला प्रकल्पासाठी आवश्यक असलेला भूखंड थेट संपादित करण्याचे अधिकार आहेत. - भूखंड देण्यास विमानतळ प्राधिकरणाने संमती दिली असली तरी रिजन्सी हॉटेलने आडमुठी भूमिका घेतली आहे. भूखंड हवा असल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीएऐवजी विमानतळ प्राधिकरणाने अर्ज करावा, अशी भूमिका रिजन्सी हॉटेलने घेतली आहे.