शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लेडिज स्पेशलसाठी दोन वर्षे वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 03:40 IST

महिला प्रवाशांत लक्षणीय वाढ झाल्याने त्यांच्यासाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी सुरू आहे.

अनिकेत घमंडी,

डोंबिवली- मध्य रेल्वेवरील एकंदर प्रवाशांची संख्या वाढतानाच त्यातील महिला प्रवाशांत लक्षणीय वाढ झाल्याने त्यांच्यासाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी सुरू आहे. मात्र, पुढील दोन वर्षांत पाचवा आणि सहावा मार्ग पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याने तोवर तरी नव्या लेडिज स्पेशल लोकल वाढणार नसल्याचे स्पष्टीकरण डीआरएम रवींद्र गोयल यांनी दिले.उपनगरी रेल यात्री उपभोक्ता समितीच्या निमंत्रित सदस्यांशी ते बोलत होते. संख्येच्या तुलनेत महिला प्रवाशांसाठी मर्यादित डबे, अपुरी जागा यामुळे गाडीत चढताना अनेक अडचणी येतात. गर्दीच्या वेळेत कल्याणहून सकाळी ८वा.च्या सुमारास अवघी एक लेडिज स्पेशल लोकल सोडली जाते. ती त्या स्थानकासह ठाकुर्ली, डोंबिवलीत येईपर्यंतच तुडुंब भरते. परिणामी, अन्य स्थानकांतील महिला प्रवाशांना तिचा उपयोग होत नाही. ती गाडी कल्याण येथून सुटत असल्याने आसनगाव, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आदी स्थानकांतील महिला प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. कल्याणमधील सर्वच महिलांना ती गाडी सोयीची नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत बदलापूर-अंबरनाथमधून आणखी एक महिला स्पेशल लोकल सोडण्यात यावी, अशी मागणी एका सदस्याने डीआरएमसमोर मांडली. मात्र, ते शक्य नाही. येत्या दोन वर्षांत आधी पाचव्या-सहाव्या मार्गांचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य आहे. तसेच रेक्स (डबे) उपलब्ध नसून ते जसजसे येतील, त्यानुसार अन्य मागण्यांवर विचार करता येईल, असेही त्यांनी सांगितले. ठाणे स्थानकातून सकाळी ९.१४ च्या सुमारास ट्रान्स-हार्बर मार्गावरून सुटणारी महिला विशेष (मातृभूमी) लोकल रिकामी धावते. त्या गाडीला १२ डबे असून ते पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे त्या गाडीतील पहिले अथवा शेवटचे सहा डबे पुरुष प्रवाशांसाठी खुले करावेत, यासाठी ठाण्यात दोन वर्षांपूर्वी आंदोलन झाले होते. एकीकडे अशी परिस्थिती असतानाच मुख्य मार्गावर मात्र लोकल उपलब्ध नाही, हे कारण पुढे केले जाते, याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी निवडणुका झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तातडीने तत्कालीन महाव्यवस्थापक सूद यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेच्या उल्हासनगर-अंबरनाथसह अन्य ठिकाणच्या महिलांनी सकाळच्या वेळेत आणखी एक महिला विशेष लोकलची मागणी केली होती. तेव्हापासून ही मागणी प्रलंबित आहे. हेही त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. >मुख्य मार्गावर विशेषत: बदलापूर ते ठाणे कळवा या स्थानकांदरम्यान महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय असली, तरी राखीव लोकल सोडताना इतर सर्व पर्यायांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी जादा महिला विशेष लोकल सोडणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.