शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाश्रमातील वृद्धांना कुलदीपकांची प्रतीक्षा

By admin | Updated: October 28, 2016 00:22 IST

आयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केले,

दिवाळीला घरी नेणार का ? : काळजाच्या तुकड्यांकडून हवाय वेळमोहन राऊत  धामणगाव रेल्वेआयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केले, अशा कुटुंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणती पणतीही दाखवीत नाहीत़ दिवाळीच्या पर्वावर आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील का, अशी आशा वृद्धाश्रमातील वृद्धांना लागली आहे़ दिवाळीच्या उत्सवाला बुधवारी वसुबारसपासून सुरूवात झाली़ यानिमित्त आपल्याला घरी न्यावे म्हणून वृद्धाश्रमातील वृद्ध धडपडतात़ जिल्ह्यात शासनाच्या अनुदानावर मोजके वृध्दाश्रम सुरळीतपणे सुरू आहे़ समाजाचे ऋण फेडावे स्वखर्चाने आठ वृध्दाश्रम जिल्ह्यात आहे़ दीपावलीच्या पार्श्वभूमिवर काही वृद्धाश्रमातील आई-वडिलांशी संवाद साधला असता संपूर्ण आयुष्यात कुलदीपकासाठी किती कष्ट घेतले, याची बेरीज,वजाबाकी त्यांनी मांडली. सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नाते संबंधातील प्रेम संपले आहे़ मूल पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहे़ पण आई-वडिलांचे खरे प्रेम पैशात विकत घेता येत नाही, हेच आजची पिढी विसरली आहे़ या पिढीला पाहिजे ते शिक्षण, हवा तेवढा पैसा मिळत आहे़ मात्र आजची पिढी खोटी प्रतिष्ठा वंशाचे दिवे जपत आहे़घराची लागलीय आसतळहाताला चटके घेत त्यांना मोठे केले़ आज ते आम्हाला विसरले आहे़ त्यामुळे वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवायची वेळ आणली आहे अशा मुलांना दीपावलीच्या सायंकाळी आनंदाचे दिवे लावतांना वृद्ध आई-वडिलांची आठवण होणार काय, चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे या गोष्टी ज्या जन्मदात्यांनी शिकविल्या त्या आई-वडिलांची दीपावली वृद्धाश्रमात साजरी होत आहे़ याचे काहीच वाटत नसेल काय दिवाळीसारख्या सणाला आपल्याला घराकडे न्यावे, अशी प्रतिक्रिया वृद्धांनी व्यक्त केली़जुन्या आठवणींना उजाळाएका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या नावाचा उल्लेख न करण्याचे सांगून वंशाचा दिव्याची कथा विशद केली़ लहान पणी या कुलदीपकाला दिवाळीचे फटाके, फराळ, कपडे मिळावे म्हणून मी आपल्या जीवाचा आटा पिटा केला आज तोच मोठा झाल्यावर आम्हाला विसरला आहे़ दिवाळीसारख्या सणाला आम्हाला घरी नेण्यास दरवर्षी टाळले जाते़ आयुष्यातील संध्याकाळ साजरी करताना आपल्या कुटुंबांचा मुख्यत्वे मुलांचा आधार असावा लागतो़ मात्र वृद्धापकाळात आमच्या सारख्या आई-वडिलांना आश्रमाचा आधार घ्यावा लागत असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले़कुलदीपक कधी देणार वेळ ?वंशाच्या दिव्याला जन्म देताना आईला मोठ्या कळा सोसाव्या लागल्यात. आयुष्याचा आधार मिळेल, मृत्यूनंतर याच कुलदीपकाच्या खाद्यांवर शेवटची विश्रांती यात्रा पूर्ण होईल, अशी आशा प्रत्येक आई-वडिलांची असते. परंतु लग्न झाल्याबरोबर या कुलदीपकांनी आपल्याला आश्रमाचा रस्ता दाखविला. वर्षातून केवळ दहा मिनीट आपल्याला भेटायला येते, अशी माहिती आता नातवंडांना खांद्यावर खेळवण्याऐवजी दु:खाचे आश्रू पुसत जीवन जगावे लागत असल्याची कैफियत एका वृद्ध महिलेने मांडली़