शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
2
९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!
3
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
4
CA ला 'बाय बाय'! आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री!
5
५ जूनला मंदिरात येऊ नका, आयोध्या राम मंदिर प्रशासनाचं भक्तांना आवाहन; नेमकं कारण काय?
6
वयाच्या ७९व्या वर्षी घरात एकट्या राहतात उषा नाडकर्णी, रडून सांगितलं दुःख, म्हणाल्या- "कधी पडले तर..."
7
Career Astro Tips: मुलांचे करिअर निवडताना त्यांची आवड आणि व्यवसायाला पूरक ग्रहदशा अवश्य बघा!
8
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
9
Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!
10
Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या
11
दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक...., भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक सेक्स वर्कर, धक्कादायक माहिती समोर  
12
दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
13
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
14
Video - बुद्धिबळाची 'राणी'! ८ वर्षांच्या मराठमोळ्या लेकीचा जगभरात डंका; विमानात जंगी स्वागत
15
आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष
16
पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
17
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
18
गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार
19
शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू
20
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज

दोन लाख कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: July 8, 2014 21:54 IST

पाऊस लांबल्याने सिंचनासाठी उपसा करणे एकमेव पर्याय

बुलढाणा: निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पिकांची भिस्त इतर जलस्रोतांवर आहे. अशा स्थितीत पाण्यासाठी कृषिपंप हा एकमेव पर्याय असताना, राज्यभरातील २ लाख ७३ हजार कृषिपंप विद्युत जोडण्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती उंचावण्यास शेतीच्या माध्यमातून मदत व्हावी, पिकांना पाणीपुरवठय़ासाठी पर्याय मिळावा, म्हणून शेतकर्‍यांसाठी कृषिपंपांच्या विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. शासनाकडून कृषिपंप मिळालेल्या लाभार्थी शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी म्हणून वीज कंपनीकडे पैशाचा भरणा केला; मात्र महावितरणकडे अर्ज करूनही, अशा लाखो शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना अद्यापही वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकर्‍यांचा आकडा मोठा आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या अकरा जिल्ह्यांमध्ये महावितरणकडून २0१३ साली २५ हजार ७७९ कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली; मात्र, आवश्यक रक्कम भरूनही ५४ हजार ६४३ कृषिपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेतच आहेत. वीज वितरणचे अधीक्षक अभियंता किशोर शेगोकार यांनी सांगितले की, कृषी विभागाचा अहवाल आणि प्राप्त आदेशानुसार वीज कर्मचारी आणि स्थानिक लोकांच्या उपस्थितीत कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे; मात्र, नवीन वीज जोडणी देण्याशी याचा काहीही संबंध नाही.