शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: July 8, 2014 21:54 IST

पाऊस लांबल्याने सिंचनासाठी उपसा करणे एकमेव पर्याय

बुलढाणा: निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पिकांची भिस्त इतर जलस्रोतांवर आहे. अशा स्थितीत पाण्यासाठी कृषिपंप हा एकमेव पर्याय असताना, राज्यभरातील २ लाख ७३ हजार कृषिपंप विद्युत जोडण्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती उंचावण्यास शेतीच्या माध्यमातून मदत व्हावी, पिकांना पाणीपुरवठय़ासाठी पर्याय मिळावा, म्हणून शेतकर्‍यांसाठी कृषिपंपांच्या विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. शासनाकडून कृषिपंप मिळालेल्या लाभार्थी शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी म्हणून वीज कंपनीकडे पैशाचा भरणा केला; मात्र महावितरणकडे अर्ज करूनही, अशा लाखो शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना अद्यापही वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकर्‍यांचा आकडा मोठा आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या अकरा जिल्ह्यांमध्ये महावितरणकडून २0१३ साली २५ हजार ७७९ कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली; मात्र, आवश्यक रक्कम भरूनही ५४ हजार ६४३ कृषिपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेतच आहेत. वीज वितरणचे अधीक्षक अभियंता किशोर शेगोकार यांनी सांगितले की, कृषी विभागाचा अहवाल आणि प्राप्त आदेशानुसार वीज कर्मचारी आणि स्थानिक लोकांच्या उपस्थितीत कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे; मात्र, नवीन वीज जोडणी देण्याशी याचा काहीही संबंध नाही.