शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

सुगरणीला प्रतीक्षा पावसाची

By admin | Updated: June 1, 2015 02:52 IST

पक्षी अन् पावसाच्या सरी याचं नात अजरामरच..! काही वेगळंच रसायन आहे यांच्यात. पाऊस म्हणजे श्रावणसरी. पाऊस म्हणजे गारवा. पाऊस म्हणजे हिरवळ

यादव तरटे पाटील, (लेखक अमरावती येथील पक्षीतज्ज्ञ आहेत) -पक्षी अन् पावसाच्या सरी याचं नात अजरामरच..! काही वेगळंच रसायन आहे यांच्यात. पाऊस म्हणजे श्रावणसरी. पाऊस म्हणजे गारवा. पाऊस म्हणजे हिरवळ. पाऊस म्हणजे मातीचा सुगंध. सूर्यनारायणाच्या कहराने अख्खी वसुंधरा तप्त होत असताना अचानक मान्सूनची चाहूल लागताच झाडे-झुडुपे यांच्यासकट प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांना एक वेगळीच खुमारी येते. अख्खे पक्षीजीवन स्वागतासाठी सज्ज होते. सुगरण, शिंपी, वटवट्या, नवरंग, तितर, मोर, पिवळ्या गालाची टिटवी, चातक, कोतवाल, सिरकीर मलकोहा, खंड्या, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू, काश्मिरी नीलकंठ, नीलकंठ, हुदहुद, राखी धनेश, मलबारी धनेश, सुतार, चंडोल अशा अनेक पक्ष्यांचा विणीचा काळ हाच आहे. उन्हाळा संपायला सुरुवात होणार आणि मग मान्सूनच पाऊस येणार याच इराद्याने सालाबादप्रमाणे हे सगळे पक्षी आपल्या जोडीदारासोबत तर कधी एकटेच घरटी बनविताना दिसतात. बुलबुल, कस्तूर, कांचन, निळ्या शेपटीचा वेडा राघू तर जीवाचा आकांत करून पोट भरून नुसते खाताना दिसतात. नवीन पिढी घडविण्यासाठी मादी व नराला भरपूर ऊर्जा लागते. तसेच अंडी दिल्यानंतर पिल्लांना पण भरपूर खाद्य भरवावे लागते. ऊन जास्त असल्यामुळे पिल्लांना तापमान सहन होत नाही. किंवा काही पक्ष्यांची अंडी पण सध्याच्या जास्त उन्हात तग धरू शकत नाही. मान्सून आणि पक्ष्यांचा पाळणा यात खूप घट्ट नाते आहे. ‘पल्लवपुच्छ कोतवाल’ हा पक्षी सध्या मेळघाट जंगलाच्या वृक्षराजीत काटक्या आणि मऊ गवताचे तुकडे जमा करून घरटे तयार करीत आहेत. जमिनीपासून अंदाजे २० ते २५ फूट उंच झाडाच्या फांदीवर कपबशीच्या आकाराचे याचे घरटे असते. आता पाऊस येईल आणि लहान पिल्ले त्यातून निघेल याचा जणू संकेतच ते देत असावेत. उत्तरेकडून ‘नवरंग’ पक्ष्यांचे देखील आपल्या भागात आगमन झाले असून, हा पक्षी नदी किंवा नाल्याच्या ठिकाणी असणाऱ्या आडोशाच्या झाड-झुडपांमध्ये घरटी करण्यासाठी सध्या जागा शोधण्यात मग्न आहे. जून, जुलैमध्ये कपाच्या आकाराचे घरटे तयार करून हा पक्षी त्यात अंडी देतो. पाऊस आला की फुलपाखरे, नाकतोडे, कोळी, बेडूक, मासे, गांडूळ, चतुर अशा अनेक कीटकांची व सजीवांची संख्या वाढणार आणि मग पोटभर खायला मिळणार हाच अंदाज बांधून घरट्यांचा सगळा खटाटोप चाललेला असतो. कावळा, चातक हे पक्षी याबाबतीत आपल्या संस्कृतीत प्रसिद्ध झाले आहेत. कावळ्याने आपले घरटे किती उंचावर बांधले यावरून पाऊस किती येईल याचा अंदाज आमचा बळीराजा घेत असतो. चातक पक्ष्याची वाट अनेक शेतकरी मोठ्या आशेने पाहतात. चातक पक्ष्याचे आगमन होणे म्हणजे पाऊस येणे हे अगदी पक्के आहे. चातक पक्ष्याला ‘रेन व्हिसीटर’ असेही म्हणतात. पावशा या पक्षाचा तर आवाजच ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ किंवा ‘पाऊस आला’ असाच येतो. चला तर मग चातकाच्या येण्याची आणि पावशाने ‘पेरते व्हा’ म्हणण्याची वाट पाहू या !