शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

१५.५ लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By admin | Updated: December 18, 2015 01:43 IST

पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम झाला असून, जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेतमालाचे नुकसान झाल्याने पश्चिम विदर्भातील विमा

अकोला : पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम झाला असून, जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेतमालाचे नुकसान झाल्याने पश्चिम विदर्भातील विमा काढणारे साडेपंधरा लाख शेतकरी नुकसानभरपाईची प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान, विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना खरेच दिलासा द्यायचा असेल तर यापुढे पिकांचा जोखीमस्तर ६० टक्क्यांवरू न ८० टक्के करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा व्हावी, अशीही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.चालू खरीप हंगामात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील १५ लाख ४२ हजार २८८ शेतकऱ्यांनी ११ लाख ८७ हजार ७१४ हेक्टरवरील विविध खरीप पिकांचा विमा काढला. या विम्यापोटी शेतकऱ्यांनी ६६ लाख १२ हजार ३२ रुपयांचा हप्ता भरला. पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील खरीप पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. मूग, उडीद व सोयाबीन पिके हातची गेली असून, कापसाचा अपेक्षित उतारा येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. म्हणूनच शेतकऱ्यांची भिस्त रबी हंगामावर होती; परंतु रबी पेरणी आणि पिकावरही परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा आधार वाटत आहे. रबी पिकांना शेतात ओलावा नाही; परंतु याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. तथापि, शेतात ओलावा नसल्याने हरभरा तुरळक स्वरू पात उगवला, तर अनेक ठिकाणी पेरलेला हरभरा आलाच नाही. मुगाच्या शेतात हरभरा येतो; पण मुगाच्या शेतातही अनेक ठिकाणी हरभरा उगवला नाही. गव्हाची पेरणीदेखील लांबली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत रबी पीक विमा काढण्याची मुदत आहे; परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत अडचण येत आहे.दरम्यान, पावसाच्या अनिश्चिततेमुळे गतवर्षी अमरावती विभागातील ३९,७२७ शेतकऱ्यांनी रबीचा पीक विमा काढला आहे. या शेतकऱ्यांना या विम्याच्या नुकसानभरपाईची अद्याप प्रतीक्षा आहे.चालू खरीप हंगाम आणखी संपल्याने या खरीप हंगामाचा विमा हंगाम संपल्यावर मिळेलच, मागील वर्षीच्या रबी हंगामाची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे.-शुद्धोधन सरदार, कृषी सह संचालक,अमरावती विभागविमा जोखीमस्तर ६० वरू न ८० टक्के केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.-शिवाजीराव देशमुख, प्रगतिशील शेतकरी, अकोला.