शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

राज्यात दीड लाख शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: May 23, 2015 01:21 IST

राज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत.

विवेक चांदूरकर - अकोलाराज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत. आता शासनाकडे निधी नसल्यामुळे वीज जोडणी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ एकीकडे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा डांगोरा शासनाच्या वतीने पिटण्यात येतो, तर दुसरीकडे विहिरीत पाणी असल्यावरही शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांमधील पाणी पिण्याकरिता उपयोगात आणले जाते. त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाहीत. शेतातील विहिरीत पाणी असल्यावरच शेतकरी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज सादर करतात. विद्युत जोडणी मिळाली तर निश्चितच सिंचनात वाढ होईल व त्यांना फायदा होईल; मात्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. चार ते पाच वर्षांपूर्वी कृषिपंप जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून आवश्यक पैसे भरले व सर्व निकष पूर्ण केले आहेत. अशा १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना आजही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महावितरण आपल्या कामाची वाहवा करीत आहे. २००५ मध्ये राज्यात नऊ लाख कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी लाखो अर्ज निकाली काढून कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. दरम्यान, धरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतामधील विहिरींची पाण्याची पातळी वाढते व शेतकरी त्या पाण्यातून सिंचन करू शकतात.