शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

राज्यात दीड लाख शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: May 23, 2015 01:21 IST

राज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत.

विवेक चांदूरकर - अकोलाराज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत. आता शासनाकडे निधी नसल्यामुळे वीज जोडणी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ एकीकडे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा डांगोरा शासनाच्या वतीने पिटण्यात येतो, तर दुसरीकडे विहिरीत पाणी असल्यावरही शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांमधील पाणी पिण्याकरिता उपयोगात आणले जाते. त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाहीत. शेतातील विहिरीत पाणी असल्यावरच शेतकरी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज सादर करतात. विद्युत जोडणी मिळाली तर निश्चितच सिंचनात वाढ होईल व त्यांना फायदा होईल; मात्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. चार ते पाच वर्षांपूर्वी कृषिपंप जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून आवश्यक पैसे भरले व सर्व निकष पूर्ण केले आहेत. अशा १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना आजही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महावितरण आपल्या कामाची वाहवा करीत आहे. २००५ मध्ये राज्यात नऊ लाख कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी लाखो अर्ज निकाली काढून कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. दरम्यान, धरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतामधील विहिरींची पाण्याची पातळी वाढते व शेतकरी त्या पाण्यातून सिंचन करू शकतात.