शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

रोजंदारी कामगार 'बेस्ट' नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 16, 2016 09:23 IST

प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेणारे बेस्ट प्रशासन मात्र त्यांच्याच सेवेत असलेल्या रोजंदारी कामगारांना बेस्ट सेवा देण्यात अपयशी ठरले आहे.

 
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १६ -  प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेणारे बेस्ट प्रशासन मात्र त्यांच्याच सेवेत असलेल्या रोजंदारी कामगारांना बेस्ट सेवा देण्यात अपयशी ठरले आहे. गेली दहा वर्षे नवघणी कामगारांच्या खालोखाल रोजंदारी सेवेत केबल टाकणे, रस्त्यावर खड्डे खणणे आणि तत्सम काम करीत असलेल्या ८६४ कामगारांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच देणे तसेच त्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यास बेस्ट उपक्रम कुचराई करत आहे. त्यामुळे आपल्या न्याय मागण्यांसाठी या कामगारांनी आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गार्‍हाणे मांडले आहे.
बेस्टने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाच्या प्रत्येक कर्मचार्‍यावर असते. यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी ते प्रथमवर्ग अधिकार्‍यांपर्यंत प्रत्येकजण काम चोख बजावत असतो. प्रशासनाच्या सेवेत असलेले कायमस्वरुपी कर्मचार्‍यांबरोबरच अनुकंपावर तत्वावर काम करणारे हे कामगार आपले काम कुशलतेने करत आहेत. तरीही या कामगारांना प्रशासकीय सेवेत कायम करण्यास प्रशासन दिरंगाई करत आहे. अनुकंपा तत्वावर दहा वर्षांपूर्वी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात रुजू झाल्यानंतर दररोज शंभर रुपये वेतन या कामगारांना मिळत होते. 
दहा वर्षांनंतर आता या कामगारांना दररोज ४४६ रुपये वेतन मिळत आहे. विजेची तार टाकताना अपघात झाल्यास या कामगारांना उपचारासाठी आर्थिक मदतही मिळत नाही. आजारपणात सुट्टी घेतल्यास तेवढय़ा दिवसांच्या वेतनाला मुकावे लागते, अशी व्यथा या कामगारांनी व्यक्त केली आहे. कायमस्वरुपी नोकरी मिळेल, या आशेवर असलेल्या या कामगारांवर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. मात्र खुला प्रवर्ग आणि अनुसुचित जाती या प्रवर्गाचे आरक्षण यापूर्वी भरण्यात आले असल्याचे उत्तर प्रशासनाकडून दरवेळी मिळत असल्याने हे कामगार हवालदिल झाले आहेत.