शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

वीजवाहिन्या बनल्या धोकादायक

By admin | Updated: October 20, 2016 03:04 IST

तुर्भे हनुमान नगर व इतर झोपडपट्टीमध्ये विद्युत मीटर केबिनची स्थिती बिकट झाली

नवी मुंबई : तुर्भे हनुमान नगर व इतर झोपडपट्टीमध्ये विद्युत मीटर केबिनची स्थिती बिकट झाली आहे. केबल इतस्थत: पडल्या असून त्यामुळे विजेचा धक्का बसून दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत असून महावितरण प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका प्रभाग ७१ चे शिवसेना शाखाप्रमुख तय्यब पटेल यांनी याविषयी महावितरण पदाधिकाऱ्यांना पत्र देवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. या परिसरामध्ये अरूंद गल्लींमध्ये विद्युत मीटर केबिन बसविल्या आहेत. पाच ते सहा वर्षापूर्वीच येथे नवीन केबिन बसविल्या होत्या. पण निकृष्टपणे काम केल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. विजेच्या केबल इतस्थत: पडल्या आहेत. या केबलला धक्का लागून दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केबिनला लहान मुलांचा किंवा नागरिकांचा हात लागला तर जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय झोपडपट्टीला आग लागण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. महावितरण प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेवून ठोस उपाययोजना करावी. वेळेत दुरूस्तीचे काम सुरू केले नाही व एखादा अपघात घडला तर त्याला पूर्णपणे संबंधित प्रशासन जबाबदार राहील. मागणीनंतरही कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा तय्यब पटेल यांनी दिला आहे.