शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘मतदान’ करणार त्याला ‘पोटभर’ मिळणार

By admin | Updated: February 13, 2017 04:06 IST

निवडणुकांच्या सुट्टीचा मुहूर्त साधत अनेक जण बाहेरगावचा बेत आखतात आणि याचा विपरित परिणाम मतदानावर होतो. साहजिकच

सचिन लुंगसे / मुंबईनिवडणुकांच्या सुट्टीचा मुहूर्त साधत अनेक जण बाहेरगावचा बेत आखतात आणि याचा विपरित परिणाम मतदानावर होतो. साहजिकच, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. ही टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून योजना राबवल्या जात असल्या, तरी त्याला मिळणारा पाठिंबा कमी असतो. मात्र, या वेळी महापालिका निवडणुकीचे औचित्य साधत आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नामी शक्कल लढवत हॉटेल्स संघटनांना दिमतीला घेतले आहे. त्या नामी युक्तीनुसार, मतदान करून जो मतदार हॉटेल्समध्ये खानपानासाठी येईल, त्याला संबंधित हॉटेल्स चालकांकडून किमान ५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या संकल्पनेला ‘आहार’ने ‘समथिंग एक्स्ट्रा’ असे संबोधले आहे.१० महानगरपालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या सार्वजनिक सुट्टीचा गैरवापर करत, अनेक जण आदल्या दिवशीच्या रात्री बाहेरगावी मनोरंजनासाठी शहराबाहेर पडतात. परिणामी, मतदानादिवशी कमी मतदान होते आणि मतदानाची टक्केवारी घसरते. यावर उपाय म्हणून मतदान जागृतीपासून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्याचा फार काही परिणाम दिसून आला नाही. परिणामी, आयोगाने आता ‘आहार’ या हॉटेल संघटनेला मदतीला घेतले आहे. ‘आहार’ संघटना मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहन करत आहे. आहार संघटनेचे सचिव संतोष शेट्टी यांनी या संदर्भात ‘लोकमत’ला सांगितले की, आहार संघटनेचे सहा हजारांहून अधिक सभासद आहेत. आम्ही आमच्या सभासदांना असे आवाहन केले आहे की, मतदानादिवशी मतदान करून हॉटेल्समध्ये खानपानासाठी दाखल होणाऱ्या ग्राहकांना सूट देण्यात यावी. हे प्रमाण सध्या ५ टक्क्यांच्या आसपास आहे. या संकल्पनेला आम्ही ‘समथिंग एक्स्ट्रा’ असे म्हटले आहे. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, एखादा ग्राहक एखाद्या हॉटेलमध्ये चहापानासाठी दाखल झाला, तर संबंधित ग्राहकाला चहासोबत दोन बिस्किटे ‘मोफत’ द्यायची, असे या योजनेचे स्वरूप असेल. मुळात मतदारांनी मतदान करावे, मतदानाची टक्केवारी वाढावी, हा यामागचा उद्देश आहे. सामाजिक जबाबदारीचे भान म्हणून हे काम आम्ही घेतले आहे. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे, आम्ही जरी आमच्या सभासदांना याबाबत आवाहन केले असले, तरीदेखील याबाबतची सक्ती केलेली नाही.