शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

ग्रामपंचायतींसाठी १९ डिसेंबरला मतदान

By admin | Updated: November 23, 2015 02:13 IST

राज्यातील २७ जिल्ह्यांतील १७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी २१ डिसेंबरला होईल

मुंबई: राज्यातील २७ जिल्ह्यांतील १७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी २१ डिसेंबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.या सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते एप्रिल २०१६ या कालावधीत संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल, तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी साडेसात ते सायंकाळी साड पाचपर्यंत मतदानाची वेळ असेल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ असेल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले. जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती :ठाणे-३, रायगड-५, रत्नागिरी-५०, सिंधुदुर्ग-२, नाशिक-९, जळगाव-९, अहमदनगर-५, नंदूरबार-१, पुणे-२, सोलापूर- ११, सातारा- १३, कोल्हापूर- ४, औरंगाबाद-३, बीड-१, नांदेड- १२, परभणी-९, उस्मानाबाद-२, जालना-४, लातूर-२, हिंगोली-५, अमरावती-२, यवतमाळ-२, बुलढाणा-४, वाशीम-३,चंद्रपूर-१, भंडारा-४ आणि गडचिरोली-५. एकूण- १७३. निवडणूक कार्यक्र म  निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक : २७ नोव्हेंबर २०१५नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे : ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर  नामनिर्देशनपत्र छाननी : ५ डिसेंबर  अर्ज मागे घेणे : ८ डिसेंबर  चिन्हांचे वाटप : ८ डिसेंबर  मतदान : १९ डिसेंबर  मतमोजणी : २१ डिसेंबर