शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी १९ डिसेंबरला मतदान

By admin | Updated: November 23, 2015 02:13 IST

राज्यातील २७ जिल्ह्यांतील १७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी २१ डिसेंबरला होईल

मुंबई: राज्यातील २७ जिल्ह्यांतील १७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी २१ डिसेंबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.या सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते एप्रिल २०१६ या कालावधीत संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल, तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी साडेसात ते सायंकाळी साड पाचपर्यंत मतदानाची वेळ असेल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ असेल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले. जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती :ठाणे-३, रायगड-५, रत्नागिरी-५०, सिंधुदुर्ग-२, नाशिक-९, जळगाव-९, अहमदनगर-५, नंदूरबार-१, पुणे-२, सोलापूर- ११, सातारा- १३, कोल्हापूर- ४, औरंगाबाद-३, बीड-१, नांदेड- १२, परभणी-९, उस्मानाबाद-२, जालना-४, लातूर-२, हिंगोली-५, अमरावती-२, यवतमाळ-२, बुलढाणा-४, वाशीम-३,चंद्रपूर-१, भंडारा-४ आणि गडचिरोली-५. एकूण- १७३. निवडणूक कार्यक्र म  निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक : २७ नोव्हेंबर २०१५नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे : ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर  नामनिर्देशनपत्र छाननी : ५ डिसेंबर  अर्ज मागे घेणे : ८ डिसेंबर  चिन्हांचे वाटप : ८ डिसेंबर  मतदान : १९ डिसेंबर  मतमोजणी : २१ डिसेंबर