शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

ग्रामपंचायतींसाठी १९ डिसेंबरला मतदान

By admin | Updated: November 23, 2015 02:13 IST

राज्यातील २७ जिल्ह्यांतील १७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी २१ डिसेंबरला होईल

मुंबई: राज्यातील २७ जिल्ह्यांतील १७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी २१ डिसेंबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.या सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते एप्रिल २०१६ या कालावधीत संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल, तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी साडेसात ते सायंकाळी साड पाचपर्यंत मतदानाची वेळ असेल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ असेल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले. जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती :ठाणे-३, रायगड-५, रत्नागिरी-५०, सिंधुदुर्ग-२, नाशिक-९, जळगाव-९, अहमदनगर-५, नंदूरबार-१, पुणे-२, सोलापूर- ११, सातारा- १३, कोल्हापूर- ४, औरंगाबाद-३, बीड-१, नांदेड- १२, परभणी-९, उस्मानाबाद-२, जालना-४, लातूर-२, हिंगोली-५, अमरावती-२, यवतमाळ-२, बुलढाणा-४, वाशीम-३,चंद्रपूर-१, भंडारा-४ आणि गडचिरोली-५. एकूण- १७३. निवडणूक कार्यक्र म  निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक : २७ नोव्हेंबर २०१५नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे : ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर  नामनिर्देशनपत्र छाननी : ५ डिसेंबर  अर्ज मागे घेणे : ८ डिसेंबर  चिन्हांचे वाटप : ८ डिसेंबर  मतदान : १९ डिसेंबर  मतमोजणी : २१ डिसेंबर